शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जैविक औषधांवरील बंदी अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:10 IST

राज्यात कृषी खात्याने परवाना दिलेल्या कृषी सेवा विक्री केंद्रांना नोंदणी नसलेल्या खते, कीटकनाशकांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यवतमाळ आणि राज्यातील अन्य काही ठिकाणी कीटकनाशकांच्या वापरामुळे मजुरांच्या मृत्यूनंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कीटकनाशक कायदा १९५८ च्या यादीत समाविष्ट नसलेल्या बिगर नोंदणीकृत पीकवाढ संजीवकांची तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मध्ये समाविष्ट नसलेल्या भूसुधारकांची व इतर उत्पादनांची विक्री यामुळे बाधित झाली आहे.

नाशिक : राज्यात कृषी खात्याने परवाना दिलेल्या कृषी सेवा विक्री केंद्रांना नोंदणी नसलेल्या खते, कीटकनाशकांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यवतमाळ आणि राज्यातील अन्य काही ठिकाणी कीटकनाशकांच्या वापरामुळे मजुरांच्या मृत्यूनंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कीटकनाशक कायदा १९५८ च्या यादीत समाविष्ट नसलेल्या बिगर नोंदणीकृत पीकवाढ संजीवकांची तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मध्ये समाविष्ट नसलेल्या भूसुधारकांची व इतर उत्पादनांची विक्री यामुळे बाधित झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सेंद्रिय बाजारपेठ नष्ट करण्याचा डाव आखला गेल्याचा आरोप शेतकरी आणि कृषी केंद्र विक्रेत्यांकडून केला जात आहे. यवतमाळमध्ये विषबाधा प्रकरण नोंदणीकृत रासायनिक कीटकनाशकांमुळेच घडल्याने त्याचा सेंद्रिय उत्पादनांशी संबंध जोडू नये, अशी अपेक्षा विक्रेते व्यक्त करीत आहेत.यवतमाळ येथील घटनेनंतर कीटकनाशक विक्रेते, शेतकरी आणि मजूर एका वेगळ्याच प्रसंगाला तोंड देत आहेत. मजुरांच्या मृत्यूनंतर सरकारने थेट जैविक, सेंद्रिय आणि पीजीआरवर बंदी घातल्याने समस्या अधिकच वाढली आहे. हा निर्णय सर्वंकष आणि चर्चेअंती होणे अपेक्षित असताना केवळ एकाएकी घातलेल्या अशा प्रकारच्या बंदीमुळे सारेच अडचणीत आले आहेत. वास्तविक यामुळे मजूर सुरक्षित झाले की दुकानदार याची कोणतीही मोजपट्टी शासनाला देता आलेली नाही. बंदीची मागणी ना मजुरांकडून करण्यात आली, ना विक्रेत्यांकडून. तरीही कोणताही अभ्यास न करता जैविक औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. खरे तर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचा हा काळ मानला जातो. किंबहुना सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ देशातच नव्हे तर परदेशातही मिळण्याची दाट शक्यता असताना त्यासाठी प्रोत्साहनपर योजना अपेक्षित आहेत. रसायनविरहित शेती असणे असे आंतरराष्टÑीय आणि राष्टÑीय धोरण असताना सेंद्रिय आणि जैविक उत्पादनावर बंदी कशी घालण्यात आली हे न उलगडणारे कोडे असल्याचे वितरक आणि शेतकºयांचेदेखील म्हणणे आहे.सेंद्रिय शेती व जैविक शेतीला सुगीचे दिवस येऊ पाहत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देतात. किंबहुना बाजारातील ग्राहकही सेंद्रिययुक्त पिकांचीच विचारणा करीत असल्याने अशा जैविक आणि सेंद्रिय शेतीयुक्त औषधांची मोठी गरज आणि मागणी निर्माण झालेली आहे. मात्र त्यावरच सरकारने बंदी घातल्याने फळबाग करणाºया शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकºयांनीदेखील या बंदीवर नाराजी व्यक्त केली आहे.