शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

बळीराजाचा जोडधंदाही धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:19 IST

सायखेडा : कॅलिफोर्निया तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुव्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु आता पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने व दुधाचा भाव पशुपालकांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पाळीव जनावरे विकत घेण्याकडे कल कमी होत आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ परिसरातील चित्र : पशुखाद्याचे दर वाढल्याचे परिणाम

सायखेडा : कॅलिफोर्निया तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुव्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु आता पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने व दुधाचा भाव पशुपालकांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पाळीव जनावरे विकत घेण्याकडे कल कमी होत आहे.शासनाकडून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. अशातच जनावरांच्या खाद्यात वाढ झाल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत. खाद्याची किमत व दुधाच्या शासकीय दरातील तफावत लक्षात घेता जनावरे कशी पाळावी, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. अशातच या खाद्याच्या भावात गेल्या अनेक वर्षांनंतर मोठी दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे पशुपालक चांगलेच संकटात सापडले आहेत.आज सद्यस्थितीत सरकी ३० रुपये किलो, ढेप ३८ रुपये किलो, सुग्रास २३ रुपये किलो, गोळीपेंड २२ रुपये किलो, तर शेंगपेंड ४५ ते ५० रुपये किलो झाली आहे. त्याप्रमाणात शासकीय दुधाचा भाव २२ रुपये लिटर आहे. खाद्य व दुधाचे दर यांच्यातील तुलना केल्यास जनावरे न पाळलेली बरी, असे शेतकरी म्हणू लागले आहे. वर्तमानकाळात दुभती जनावरे पाळण्याच्या संख्येत बरीच घट झाली आहे.एकीकडे संपूर्ण निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गवत, गंजी आणि कडब्याची नेहमीच कमतरता असते, तर दुसरीकडे दिवसेंदिवस खाद्याच्या वाढत्या दरामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.चौकट...शासनाकडून शेतीपूरक व्यवसायाला दुग्ध व्यवसायाची जोड द्यावी असे सल्ले वारंवार दिले जात असून, अनुदानावर जनावरे दिली जात आहेत. अशातच आता जनावरांच्या खाद्यात विक्रमी वाढ केल्याने पशुपालकांनी अनुदानावर देण्यात येणारे ते जनावरे घेण्याकडे पाठ फिरविली आहे. शासनाने दुधाच्या शासकीय दरात वाढ करावी किंवा जनावरांच्या खाद्यांचे दर कमी करावे, अन्यथा येत्या काळात जनावरे पाळणाऱ्यांचे प्रमाण आणखी कमी होण्याची भीती नाकारता येत नाही.- गणेश मोगल, संचालक, दूध डेअरी, भेंडाळी

टॅग्स :Farmerशेतकरीmilkदूध