शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:29 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बरीच गावांना पावसाने आपला लहरी पणा दाखवत दडी मारली आहे. त्यामुळे बरीच पिके पाणी विना तडफडण्यास सुरु वात झाल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. आठवड्यापूर्वी लखमापूर, करंजवण, दहेगाव वागळुद, ओझे, अवनखेड, परमोरी, ओझरखेड आभागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु आता मात्र भर पावसाळ्यात पाऊस नाही. पण पावसाळी वातावरण भरपूर असुन पावसाचा एक थेंब ही पडत नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील : पिकांची पाणी विना तडफड

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बरीच गावांना पावसाने आपला लहरी पणा दाखवत दडी मारली आहे. त्यामुळे बरीच पिके पाणी विना तडफडण्यास सुरु वात झाल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. आठवड्यापूर्वी लखमापूर, करंजवण, दहेगाव वागळुद, ओझे, अवनखेड, परमोरी, ओझरखेड आभागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु आता मात्र भर पावसाळ्यात पाऊस नाही. पण पावसाळी वातावरण भरपूर असुन पावसाचा एक थेंब ही पडत नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.खरीप हंगाम शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करायला लावत असुन जर जोमात वाढणारी दमदार पिकं आता पाण्याविना जातील की काय. यांची भीती निर्माण झाली आहे. आकाशात पावसाळी ढग भरपूर पण पाऊस पडत नाही. यासाठी शेतकरी वर्गाने महादेवाला साकडे घातले आहे. अत्यंत महागडे किंमतीचे बी बियाने खरेदी करून ते पेरणी केली. परंतु आता मात्र तेच पिके जोमाने वाढत असताना पावसाची कमतरता शेतकरी वर्गा समोर नव्या संकटाच्या रूपाने उभी राहिली आहे.एक हंगाम गेला की दुसरा हंगाम ही नवीन नवीन संकटे घेऊन उभा राहातो.तेव्हा शेती मधील आवाहने कशी पेलवायची ही गहन समस्या शेतकरी वर्गापुढे भयानक रूपाने उभी राहिली आहे. देशाचा पोशिंदा शेतकरी हा कायम आर्थिक संकटात सापडत असल्यामुळे पुढे शेती कशी करायची, भांडवल कसे तयार करायचे, पिकवलेल्या शेती मालाला हमी भाव मिळाला नाही तर संसार कसा चालवावा. तसेच वेगवेगळ्या ठिकाणीहुन घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवेचनेत बळीराजा सापडला आहे.प्रतिक्रि या...मागील वर्षी व यंदाच्या हंगामात शेतकरी वर्ग मेटाकूटीला आला आहे. कारण कुठल्याही पिकाला हमी भाव नाही. पैसा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक हंगामातील आवाहने वेगवेगळी आता शेती धंदा सोडावा की काय ही समस्या आम्हाला भेडसावत आहे.- हिरामण मोगल, शेतकरी, लखमापूर.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी