शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीने खºया अर्थाने बळीराजाची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:18 IST

सुभाष भामरे : जिल्ह्यातील ३० शेतकºयांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून अवर्षण, गारपीट व अवकाळी पावसाने कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांना राज्य सरकारने शब्द दिल्याप्रमाणे कर्जमुक्ती दिल्याने आज खºया अर्थाने बळीराजाची दिवाळी साजरी होत असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

सुभाष भामरे : जिल्ह्यातील ३० शेतकºयांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून अवर्षण, गारपीट व अवकाळी पावसाने कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांना राज्य सरकारने शब्द दिल्याप्रमाणे कर्जमुक्ती दिल्याने आज खºया अर्थाने बळीराजाची दिवाळी साजरी होत असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे छत्रपती शिवाजी स्वाभिमान शेतकरी कर्जमुक्ती अभियानांतर्गत बुधवारी जिल्ह्यातील ३० कर्जदार शेतकरी दाम्पत्यांचा डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र तसेच साडी, चोळी व शाल, टोपी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. भामरे पुढे म्हणाले, शेतमालाला रास्त भाव, शेतीला वीज व पाणी देण्याचे प्राथमिक कर्तव्य सरकारचे आहे. परंतु आजवरच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. देशातील एकूण फक्त ४८ टक्के जमीन सिंचनाखाली असून, त्यातील पंजाब व हरियाणा येथे ९८ टक्के तर उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत ४० टक्क्याच्या पुढे सिंचन होते. महाराष्टÑात फक्त १६ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे.गेल्या सरकारने ६० हजार कोटी रुपये सिंचनासाठी खर्च करूनही एक टक्काही सिंचनाचे क्षेत्र वाढले नाही. याचाच अर्थ सरकारचे शेतीचे नियोजन चुकले होते. परंतु देशात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शाश्वत शेतीवर भर देण्यात आला. जलयुक्त शिवार योजना राबवून जवळपास २० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात सरकारला यश आले. जवळपास १५ हजार खेड्यांचा पाणीप्रश्न त्यामुळे सुटला व पुढच्या दोन वर्षांत आणखी १० हजार खेड्यांचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेदेखील जलयुक्त शिवार योजनेला चळवळ म्हणून गौरविले आहे.केंद्र सरकारनेदेखील शेतीचा विकास करण्याचे धोरण अवलंबिले. पंतप्रधान सिंचन योजनेच्या माध्यमातून देशपातळीवर ९९ सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यात एकट्या महाराष्टÑाचे २६ प्रकल्प असल्याची माहितीही डॉ. भामरे यांनी यावेळी दिली. या योजनेंतर्गत अपूर्ण प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे सांगून, नाशिक जिल्ह्यातील नार-पार या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी तसेच मांजरपाडा प्रकल्प दोनसाठीदेखील राज्यपालांची मंजुरी घेण्यात आली असून, सरकार वेगवेगळ्या माध्यमातून शेतकºयांचे प्रश्न सोडवित असल्याचे सांगितले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम, डॉ. राहुल अहेर, मनीषा पवार आदी उपस्थित होते. विरोधी आमदारांचा बहिष्कारसंरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शेतकरी कर्जमाफी समारंभाकडे राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसच्या आमदारांनी पाठ फिरविली. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्याही आमदारांची अनुपस्थिती उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय होती; मात्र कार्यक्रमाच्या सरतेशेवटी शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम यांनी याठिकाणी हजेरी लावली, परंतु चौकशीअंती संरक्षण राज्यमंत्र्यांना एचएएल कामगार संघटनेचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळासमवेत कदम आले होते; मात्र या कार्यक्रमात सर्वच पदाधिकाºयांनी हजेरी लावल्याने कार्यक्रम भारतीय जनता पक्ष पुरस्कृत असल्याचे दिसत होते.मुख्यमंत्र्यांकडून नाशिकला विचारणामुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्य समारंभाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. मुख्यमंत्री स्वत:च प्रत्येक जिल्ह्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेत असल्याने नाशिकचा कार्यक्रम सुरू असताना त्यांनी नाशिकची माहिती विचारली. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी यावेळी नाशिकची माहिती दिली. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांचे शेतकºयांना केलेले मार्गदर्शन प्रक्षेपित करण्यात आले. आकडेवारीबाबतसंभ्रम कायमशेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून, येत्या आठ दिवसांत पात्र ठरलेल्या सर्वच शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले, परंतु नाशिक जिल्ह्यातील किती शेतकरी या योजनेत पात्र ठरले त्यांच्या आकडेवारीबाबत संभ्रम कायम आहे. खुद्द संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीही आकडेवारीबाबत अनभिज्ञता दर्शविली तर सहकार खात्याच्या अधिकाºयांनाही ठोस सांगता आले नाही; मात्र ज्या शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही किंवा ते कागदोपत्री पूर्तता करण्यास अपात्र ठरले त्यांच्याकडून पुन्हा पूर्तता करून घेण्यात येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.