शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

नाशिकला बाळासाहेब ठाकरे ‘एकनिष्ठ’ आघाडी

By admin | Updated: February 9, 2017 00:24 IST

अधिकृत उमेदवार ठरले अपक्ष : दोन गटात निवडणूक लढविणार

 नाशिक : महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या ए.बी. फॉर्मचा गोंधळ कायम राहिल्याने शिवसेनेचे एकलहरे गणातील अधिकृत उमेदवार तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांना अपक्ष निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी या गणातून सचिन युवराज जगताप यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले.दरम्यान, एकलहरे व पळसे गटासह या गटातील चारही गणात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एकनिष्ठ आघाडी स्थापन करून तिकीट नाकारलेले उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारांसमोर निवडणूक लढणार असल्याने शिवसेनेला तो एक धक्का मानला जात आहे. एकलहरे गटातून खासदारपुत्र अंजिक्य हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्याने गटातील तिकिटाचे प्रबळ दावेदार एकलहरे सरपंच शंकर धनवटे नाराज झाले होते. तसेच एकलहरे गणातून ३ फेब्रुवारीलाच सचिन युवराज जगताप यांनी शिवसेनेच्या ए.बी. फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला होता. तर तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांना अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी ए.बी. फॉर्म देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळालेली नाही. तिकडे पळसे गटातून शिवसेनेकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी सदस्य संजय तुंगार व पंचायत समिती उपसभापती अनिल ढिकले यांना डावलून उपजिल्हाप्रमुख जगन आगळे यांना उमेदवारी दिल्याने दोन्ही नाराज होते. त्यातच तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांचा शिवसेनेचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्याने नाराजीत भरच पडली. त्यामुळे या सर्व नाराजवीरांनी बुधवारी एका ठिकाणी मेळावा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानत त्यांच्या नावानेच एकनिष्ठ आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, पळसे व एकलहरे गटासह पळसे, सिद्धपिंप्री, एकलहरे व लहवित गणातून या एकनिष्ठ आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)