शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बालाजी विवाह सोहळा उत्साहात

By admin | Updated: October 9, 2016 01:38 IST

कुर्यात सदा मंगलम् ... : वऱ्हाडी भाविकांची झाली गर्दी

नाशिक : गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा... अशा मंगलाष्टकाच्या गजरात आणि व्यंकट रमणा गोविंदा असा जयघोष करत गंगापूर धबधबा येथील बालाजी मंदिरात भगवान बालाजी यांचा विवाह सोहळा शनिवारी (दि. ८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शनिवारी (दि. १) ब्रह्मोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून, दररोज येथील बालाजी मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मोत्सवांतर्गत शनिवारी (दि. ८) पुरोहित मयूर मेघश्याम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गोरज मुहूर्तावर देवी पद्मावतीशी भगवान बालाजी यांचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ४) लवाटेनगर येथील महालक्ष्मी मंदिरात देवीला महावस्त्र अर्पण करून लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते.यावेळी आनंद जोशी, प्रमोद भार्गवे, राजाराम मोगल, आशिष कुलकर्णी, महेश हिरे, अशोक खोडके, हेमंत कुलकर्णी, नरेंद्र चांदवडकर आणि अवधूत देशपांडे आदि विश्वस्तांसह शहरातील विविध भागातून आलेल्या वऱ्हाडी भाविकांची यावेळी सोहळ्यासाठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)