शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

दिव्यांनी उजळले बालाजी मंदिर

By admin | Updated: November 15, 2016 02:31 IST

गोविंदा गोविंदाचा जयघोष : लक्ष लक्ष दिव्यांची आरास; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

 .नाशिक : सज्जनांचे रक्षण करत दुष्टांचे निर्दालन करण्याचा सामाजिक संदेश देणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सोमवारी (दि.१४) गंगापूर परिसरातील बालाजी मंदिराचा परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला. येथील शंकराचार्य न्यासच्या बालाजी मंदिरात हजारो भाविकांनी दिव्याला दिवा लावून लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती प्रकाशमान केल्या. भाविकांनी गोविंदा... गोविंदा...चा जयघोष करून एक लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले. त्रिपुरारी पौर्णिमेबाबत सांगितल्या जाणाऱ्या लोककथेनुसार त्रिपूर नावाच्या उन्मत्त असुराचा या दिवशी अंत करण्यात आला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. त्रिपूर असुराचा संहार झाल्याबद्दल ही पौर्णिमा दीप पेटवून साजरी केली जाते. कार्तिकी पौर्णिमेला प्रदोषकाळी त्रिपुरासुराला ठार मारल्याने आनंदोत्सव म्हणून दिवाळीप्रमाणेच मंदिरे, नदीकिनारी दीप प्रज्वलित केले जातात. त्यानुसार येथील बालाजी मंदिर परिसर दीपमाळ दिव्यांनी सजविण्यात आला. या दीपोत्सवाची सुरुवात एलआयसीचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप शैने, चंदूलाल शाह, ट्रस्टचे अध्यक्ष आनंद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उत्तर भारतात त्रिपुरारी पौर्णिमा स्कंद जयंती म्हणून साजरी केली जाते, तर दक्षिण भारतात त्रिपुरारी पौर्णिमेला कृतिका महोत्सव साजरा होतो. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात नरकासुर, त्रिपुरासुर आणि अन्य असुरांचा देवादिकांनी वध केल्याने दीपावलीपासून दीपप्रज्वलन करण्याची परंपरा सुरू झाली असून या दीपोत्सवाची त्रिपुरारी पौर्णिमेला सांगता होत असल्याने शहरातील हजारो भाविकांनी मंदिर परिसरात एकत्रित दीप प्रज्वलित करून समाजातील दुष्ट प्रवृत्ती जाळून टाका, असा सामाजिक संदेश त्रिपुरी वाती पेटवून दिला. (प्रतिनिधी)