शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:31 IST

राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या पावसामुळेही रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे.

नाशिक : राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या पावसामुळेही रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या काळात खास काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. तर कांदा उत्पादक शेतकºयांसमोर पावसापासून कांदा वाचविण्याचे संकट उभे असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीपासून फळभाज्या व पालेभाज्या वाचविण्यासाठीही शेतकºयांना कसरत करावी लागत आहे.  जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकºयांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले असताना जूनच्या उत्तरार्धात ढगाळ हवामान आणि वादळी वाºयामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या काळात होणाºया गारपिटीमुळे पाने फाटणे, हिरव्या काडीवर जखमा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे जिवाणू करपा किंवा मोट्रीओडिप्लोडिया यांसारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. द्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोर अशाप्रकारे करपा नियंत्रणाचे आव्हान असताना कांदा उत्पादक व फळभाज्या, पालेभाज्या उत्पादन शेतकरीही संकटात आहे. मान्सूनचा पाऊस तोंडावर आलेला असताना भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना कांदा साठविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या आगमनाबरोबरच शेतक ºयांची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. मात्र पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी किमान ८० ते ९० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकºयांनी पेरणी करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.पावसाच्या अंदाजानुसार पीकपद्धती ठरवाभारतीय हवामानशास्त्र दरवर्षी एप्रिल महिन्यात लांबपल्ल्याचा हवामान अंदाज वर्तवते. त्यानुसार ज्या भागात सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे त्या भागात कमी पाण्यावर येणाºया पिकांची निवड करावी. त्यात भुईमूग, सोयाबीन, घेवडा, मूग, मटकी, उडीद, धने तसेच कमी कालावधीचं तुरीचं वाण, बाजरी, ज्वारी, सूर्यफूल, मिरची इत्यादी पिकांच्या निवडीस प्राधान्य देण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी