शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

बोंडअळी अनुदानासाठीचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:56 IST

येवला : तालुक्यातील बोकटेसह २५ गावांतील कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या रखडलेल्या अनुदानासाठी ४० शेतकºयांनी सुरू केलेले उपोषण प्रांताधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले.

ठळक मुद्देयेवला तालुका : निधी देण्याचे प्रांताधिकाऱ्यांकडून आश्वासन

येवला : तालुक्यातील बोकटेसह २५ गावांतील कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या रखडलेल्या अनुदानासाठी ४० शेतकºयांनी सुरू केलेले उपोषण प्रांताधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले.गुलाबी बोंडअळीने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून २५ गावांतील अनुदानाचे तातडीने वाटप करावे, यासाठी तहसील कार्यालयासमोर हितेश दाभाडे, किरण दाभाडे, भाऊसाहेब कदम, संभाजी कदम, अशोक दाभाडे, गुलाब दाभाडे, ज्ञानेश्वर दाभाडे, रोशन खांबकर, राजेंद्र दाभाडे, माणिक दाभाडे, बबन घोडेराव, कमलेश दाभाडे, पोपट दाभाडे, विलास दाभाडे, जालिंदर दाभाडे, सोपान साळवे, राहुल लासुरे, सोमनाथ कदम, अरु ण जाधव, बाळासाहेब गायकवाड आदींसह ४० शेतकºयांनी उपोषण सुरू केले होते. या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा करून निधी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठीची प्रक्रि या तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले. या आशयाचे पत्र तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या वतीने नायब तहसीलदार यांनी दिले. या उपोषणास तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.निधी खात्यावर वर्ग करातालुक्यातील ९७ गावांना आजपर्यंत अनुदानाचे वाटप करण्यात आले. मात्र, तालुक्यातील पूर्वभागातील बोकटे गावासह २५ गावांतील शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. २५ गावे मिळून ३ कोटी ३७ लाख ५८ हजार ६०१ रु पयांचा निधी अजून शासनाकडून मिळालेला नाही. तो निधी तत्काळ शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.