शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर मतदार नोंदणीस बाबुगिरीचा फटका

By admin | Updated: November 22, 2015 23:59 IST

विधान परिषद निवडणूक : मुक्त विद्यापीठाचे पदवीधरही वंचित

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी अत्यल्प नोंदणीस तहसील कार्यालयातील बाबुगिरी कारणीभूत ठरली असून, अनेक पात्र पदवीधरांना वेगवेगळी कारणे सांगून अर्ज नाकारण्यात आल्याने त्याचा फटका निवडणूक आयोगाच्या नोंदणीस बसला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सुमारे दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत अवघी सहा हजार नवीन मतदार नोंदणी होऊ शकली आहे.विधानपरिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी वर्षभराने निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यासाठी निवडणूक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्यात एकाच वेळी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला. दर निवडणुकीला पदवीधरांची वाढणारी संख्या लक्षात घेता ही मोहीम राबविण्यात येत असते. तथापि, यंदा अत्यंत निरुत्साहात पाचही जिल्ह्यांत मिळून अवघे २६ हजार पदवीधरांनीच नावे नोंदवली आहेत. त्यातही नाशिक जिल्ह्यात अवघ्या सहा ते साडे हजार पदवीधरांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे पदवीधरांची उदासीनता हा एक भाग आहेच, परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करण्यासाठी आलेल्यांना कागदावरचे नियम दाखवत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बाबूंनी परत पाठविल्याची तक्रार आहे. पदवीचे गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र यापैकी एक पर्याय असताना अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्राची सक्ती केली. वास्तविक, पदवी शिक्षण घेताना प्रमाणपत्रापेक्षा गुणपत्रिका महत्त्वाची असते परंतु तरीही कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही. इतकेच नव्हे तर आता स्वसाक्षांकन चालू शकेल असा शासनाचा निर्णय असतानादेखील राजपत्रित अधिकाऱ्यांचेच साक्षांकन आवश्यक असल्याचे सांगण्यात आल्याने पदवीधरांना माघारी जावे लागले. विशेष म्हणजे समकक्ष अभ्यासक्रमांच्या यादीत नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उल्लेख नाही, त्या उलट अमेरिका आणि कॅनडाच्या विद्यापीठांचा मात्र समावेश आहे. अशा प्रकाराच्या गोंधळामुळे अनेक पदवीधरांना वंचित राहावे लागल्याचे संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितले. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या अशा बाबुगिरीमुळेच नाशिक विभागात अत्यल्प नोंदणी झाल्याचा आरोप केला आहे. (प्रतिनिधी)