शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली केवळ ७ लाख ग्रामस्थांपर्यंत

By धनंजय रिसोडकर | Updated: September 17, 2023 16:25 IST

‘आयुष्मान भारत’ या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनेबाबतही यंत्रणेकडून योग्य प्रकारे कार्यवाही करण्यात येत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

नाशिक : ‘आयुष्मान भारत’ या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनेबाबतही यंत्रणेकडून योग्य प्रकारे कार्यवाही करण्यात येत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. जिल्ह्यात सुमारे २३ लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत अवघ्या ७ लाख लाभार्थ्यांपर्यंतच योजना पोहोचली आहे.

जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी तंबी देत केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीचे आयोजन शनिवारी (दि. १६) जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. नियोजन भवनात सलग तीन तास चाललेल्या बैठकीत जिल्ह्याच्या आरोग्यस्थितीचा आढावा घेत पवार यांनी अधिकाऱ्यांना सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, मालेगाव महानगरपालिका प्रशासक भालचंद्र गोसावी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरकर समितीचे अशासकीय सदस्य यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ मोहीम सुरू होते आहे. २ ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या सेवा पंधरवड्यात विविध आरोग्यविषयक कार्यक्रम व मेळावे घेण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत ‘आभा कार्ड’चे जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख वितरण झाले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आयुष्मान भव मोहिमेंतर्गत दर शनिवारी मेळाव्याचे आयोजन होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक