शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नुकसानग्रस्त द्राक्ष बागांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:00 IST

शिरवाडे वणी : अवकाळी पाऊस, गारपीट, फयान रोगामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्षबागा नुकसानग्रस्त झाल्याने द्राक्ष बागांवर संतप्त उत्पादकांनी कुऱ्हाडीचे घाव घातले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये संताप : निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका

शिरवाडे वणी : अवकाळी पाऊस, गारपीट, फयान रोगामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्षबागा नुकसानग्रस्त झाल्याने द्राक्ष बागांवर संतप्त उत्पादकांनी कुऱ्हाडीचे घाव घातले.

निफाड तालुका द्राक्ष उत्पादनात अग्रेसर मानला जात असून, द्राक्षाच्या प्रगत शेतीमुळे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया समजला जात होता. द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जात होते. तसेच परकीय चलन मिळवून देणारे एकमेव पीक मानले जात असत.

मागील चाळीस वर्षांच्या कालखंडाकडे दृष्टिक्षेप टाकला असता द्राक्ष वेलींची वयोमर्यादा किमान पंचवीस ते तीस वर्षापर्यंत राहात होती .परंतु नवनवीन तंत्रज्ञानानुसार द्राक्षांच्या वेगवेगळ्या जाती द्राक्ष उत्पादकांना दिवसेंदिवस मोहात पाडत आहेत व प्रति पाच वर्षांनंतर बाजारात द्राक्षाच्या विविध वाणांची लागवड करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना अपेक्षा पोटी थोड्या कालावधीतच द्राक्ष बागा काढून त्या ठिकाणी नवीन द्राक्ष बागेची लागवड करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून द्राक्ष वेलींना अवकाळी पावसाचे व गारपीट फयान वादळी वारे यांचा फटका बसत आहे.रोगांचा प्रादुर्भावविविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे परिणामी रोगामुळे द्राक्ष वेली मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत चालल्या आहेत. त्यामुळे वीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेल्या द्राक्ष बागेला आता सात ते आठ वर्षांनंतरच कुर्‍हाडीचे घाव सोसण्यास तयार व्हावे लागत आहे. मागील दोन वर्षात पावसाळी वातावरणात छाटलेल्या द्राक्ष बागांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे औषधांच्या अनाठाई वापरामुळे निकृष्ट दर्जाच्या होऊन गेल्या.बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणीद्राक्ष बागा वाचविण्यासाठी भरमसाठ औषधांचा खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्यामुळे द्राक्ष वेलींवर रोगांचे प्रमाण वाढून अशक्त झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अशा द्राक्ष वेलींवर कुऱ्हाड घालण्याची वेळ आली आहे. एकावेळी लावलेली द्राक्ष बाग किमान वीस वर्ष टिकण्यायोग्य असताना पाच ते सात वर्षात द्राक्षवेली समूळ काढून नवीन द्राक्ष बाग तयार करण्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागत आहे.उत्पादन कमी अन‌् खर्चात वाढनवीन द्राक्ष बागेपासून उत्पादन घेण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागत असून, खर्चही मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. परंतु अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्ष बागांपासून मिळणारे उत्पादन कमी मिळत असून, खर्च तेवढाच करावा लागत असल्यामुळे खर्च वजा जाता शिल्लक पुरेपूर होत नसल्यामुळे नाईलाजास्तव अशा द्राक्षबागा समूळ नष्ट करून नवीन लागवड करणेच योग्य असल्याचे द्राक्ष उत्पादकांकडून ऐकावयास मिळत आहे.(०१ शिरवाडे वणी)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी