शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

नुकसानग्रस्त द्राक्ष बागांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:00 IST

शिरवाडे वणी : अवकाळी पाऊस, गारपीट, फयान रोगामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्षबागा नुकसानग्रस्त झाल्याने द्राक्ष बागांवर संतप्त उत्पादकांनी कुऱ्हाडीचे घाव घातले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये संताप : निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका

शिरवाडे वणी : अवकाळी पाऊस, गारपीट, फयान रोगामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्षबागा नुकसानग्रस्त झाल्याने द्राक्ष बागांवर संतप्त उत्पादकांनी कुऱ्हाडीचे घाव घातले.

निफाड तालुका द्राक्ष उत्पादनात अग्रेसर मानला जात असून, द्राक्षाच्या प्रगत शेतीमुळे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया समजला जात होता. द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जात होते. तसेच परकीय चलन मिळवून देणारे एकमेव पीक मानले जात असत.

मागील चाळीस वर्षांच्या कालखंडाकडे दृष्टिक्षेप टाकला असता द्राक्ष वेलींची वयोमर्यादा किमान पंचवीस ते तीस वर्षापर्यंत राहात होती .परंतु नवनवीन तंत्रज्ञानानुसार द्राक्षांच्या वेगवेगळ्या जाती द्राक्ष उत्पादकांना दिवसेंदिवस मोहात पाडत आहेत व प्रति पाच वर्षांनंतर बाजारात द्राक्षाच्या विविध वाणांची लागवड करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना अपेक्षा पोटी थोड्या कालावधीतच द्राक्ष बागा काढून त्या ठिकाणी नवीन द्राक्ष बागेची लागवड करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून द्राक्ष वेलींना अवकाळी पावसाचे व गारपीट फयान वादळी वारे यांचा फटका बसत आहे.रोगांचा प्रादुर्भावविविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे परिणामी रोगामुळे द्राक्ष वेली मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत चालल्या आहेत. त्यामुळे वीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेल्या द्राक्ष बागेला आता सात ते आठ वर्षांनंतरच कुर्‍हाडीचे घाव सोसण्यास तयार व्हावे लागत आहे. मागील दोन वर्षात पावसाळी वातावरणात छाटलेल्या द्राक्ष बागांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे औषधांच्या अनाठाई वापरामुळे निकृष्ट दर्जाच्या होऊन गेल्या.बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणीद्राक्ष बागा वाचविण्यासाठी भरमसाठ औषधांचा खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्यामुळे द्राक्ष वेलींवर रोगांचे प्रमाण वाढून अशक्त झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अशा द्राक्ष वेलींवर कुऱ्हाड घालण्याची वेळ आली आहे. एकावेळी लावलेली द्राक्ष बाग किमान वीस वर्ष टिकण्यायोग्य असताना पाच ते सात वर्षात द्राक्षवेली समूळ काढून नवीन द्राक्ष बाग तयार करण्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागत आहे.उत्पादन कमी अन‌् खर्चात वाढनवीन द्राक्ष बागेपासून उत्पादन घेण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागत असून, खर्चही मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. परंतु अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्ष बागांपासून मिळणारे उत्पादन कमी मिळत असून, खर्च तेवढाच करावा लागत असल्यामुळे खर्च वजा जाता शिल्लक पुरेपूर होत नसल्यामुळे नाईलाजास्तव अशा द्राक्षबागा समूळ नष्ट करून नवीन लागवड करणेच योग्य असल्याचे द्राक्ष उत्पादकांकडून ऐकावयास मिळत आहे.(०१ शिरवाडे वणी)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी