शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कर्करोगाविषयी होणारी जनजागृती अपुरी सुभाष अवचट : एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:49 IST

नाशिक : कॅन्सर हा अत्यंत वाईट शब्द असून, या शब्दाचा संबंध माझ्या वहिनीच्या निधनाच्या वेळी मला अत्यंत जवळून आला. मातोश्रीसमान असलेल्या वहिनींना या आजाराने हिरावून नेले.

ठळक मुद्देरोगाचे समूळ उच्चाटन होऊन नियंत्रण मिळवायला हवेकलेचा समाजासाठी केलेला उपयोग वाखाणण्याजोगा

नाशिक : कॅन्सर हा अत्यंत वाईट शब्द असून, या शब्दाचा संबंध माझ्या वहिनीच्या निधनाच्या वेळी मला अत्यंत जवळून आला. मातोश्रीसमान असलेल्या वहिनींना या आजाराने हिरावून नेले. कर्करोगावर जनजागृती जरी सातत्याने होत असली तरी ती लोकसंख्येच्या तुलनेने अपुरी आहे. यासाठी सर्वांनी सर्वसमावेशक प्रयत्न करणे गरजेचे असून, या रोगाचे समूळ उच्चाटन होऊन नियंत्रण मिळवायला हवे, असे मत प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांनी व्यक्त केले. शहरातील सर्व कलाकारांनी आपल्या कलेद्वारे निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी व कर्करोगाशी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने चित्राकृती प्रदर्शनाच्या रूपाने सादर केल्या. ‘कलेवरील तुमचे प्रेम जीव वाचवू शकते’ या संकल्पनेनुसार चित्रकला प्रदर्शनाचे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये शनिवारी (दि.७) उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून अवचट उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री विनायकदादा पाटील, प्रा. अनिल नाईक, वसंत नगरकर, डॉ. राज नगरकर उपस्थित होते. यावेळी अवचट म्हणाले, कर्करोग मोठा आजार असला तरी या आजाराबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही, या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचार व अत्याधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. कलावंत हादेखील एक माणूसच असतो. नाशिकच्या कलावंतांनी त्यांच्यामधील ‘माणूस’ जिवंत ठेवत आपल्या कलेच्या माध्यमातून लहान मुलांना जीवदान देण्यासाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. मुळात नाशिकच्या मातीचे हे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. येथील लोकांमध्ये रसिकतेसोबत मानवी संवेदनाही तितक्याच जिवंतपणे दिसून येतात.विनायकदादा यांनी, नाशिकच्या मातीत समाजाची वीण गुंफण्यासाठी लागणारा माणुसकी व करुणेचा ओलावा टिकून असल्याचे सांगितले. नाशिक हे झपाट्याने प्रगती करणाºया शहरांपैकी एक आहे. नाशिकमध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयासारखी औषधोपचार करणारी व्यवस्था उपलब्ध होईल, असे कधीही वाटले नव्हते, असे ते यावेळी म्हणाले. नाईक यांनीही नाशिकच्या कलावंतांचे कौतुक करत त्यांनी आपल्या कलेचा समाजासाठी केलेला उपयोग वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. यावेळी प्रदर्शनाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कर्करोगाशी लढा देणाºया ‘त्या’ निरागस बालकांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. राज नगरकर यांनी केले व सूत्रसंचालन तन्वी अमीत यांनी केले.