शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

कर्करोगाविषयी होणारी जनजागृती अपुरी सुभाष अवचट : एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:49 IST

नाशिक : कॅन्सर हा अत्यंत वाईट शब्द असून, या शब्दाचा संबंध माझ्या वहिनीच्या निधनाच्या वेळी मला अत्यंत जवळून आला. मातोश्रीसमान असलेल्या वहिनींना या आजाराने हिरावून नेले.

ठळक मुद्देरोगाचे समूळ उच्चाटन होऊन नियंत्रण मिळवायला हवेकलेचा समाजासाठी केलेला उपयोग वाखाणण्याजोगा

नाशिक : कॅन्सर हा अत्यंत वाईट शब्द असून, या शब्दाचा संबंध माझ्या वहिनीच्या निधनाच्या वेळी मला अत्यंत जवळून आला. मातोश्रीसमान असलेल्या वहिनींना या आजाराने हिरावून नेले. कर्करोगावर जनजागृती जरी सातत्याने होत असली तरी ती लोकसंख्येच्या तुलनेने अपुरी आहे. यासाठी सर्वांनी सर्वसमावेशक प्रयत्न करणे गरजेचे असून, या रोगाचे समूळ उच्चाटन होऊन नियंत्रण मिळवायला हवे, असे मत प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांनी व्यक्त केले. शहरातील सर्व कलाकारांनी आपल्या कलेद्वारे निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी व कर्करोगाशी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने चित्राकृती प्रदर्शनाच्या रूपाने सादर केल्या. ‘कलेवरील तुमचे प्रेम जीव वाचवू शकते’ या संकल्पनेनुसार चित्रकला प्रदर्शनाचे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये शनिवारी (दि.७) उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून अवचट उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री विनायकदादा पाटील, प्रा. अनिल नाईक, वसंत नगरकर, डॉ. राज नगरकर उपस्थित होते. यावेळी अवचट म्हणाले, कर्करोग मोठा आजार असला तरी या आजाराबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही, या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचार व अत्याधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. कलावंत हादेखील एक माणूसच असतो. नाशिकच्या कलावंतांनी त्यांच्यामधील ‘माणूस’ जिवंत ठेवत आपल्या कलेच्या माध्यमातून लहान मुलांना जीवदान देण्यासाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. मुळात नाशिकच्या मातीचे हे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. येथील लोकांमध्ये रसिकतेसोबत मानवी संवेदनाही तितक्याच जिवंतपणे दिसून येतात.विनायकदादा यांनी, नाशिकच्या मातीत समाजाची वीण गुंफण्यासाठी लागणारा माणुसकी व करुणेचा ओलावा टिकून असल्याचे सांगितले. नाशिक हे झपाट्याने प्रगती करणाºया शहरांपैकी एक आहे. नाशिकमध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयासारखी औषधोपचार करणारी व्यवस्था उपलब्ध होईल, असे कधीही वाटले नव्हते, असे ते यावेळी म्हणाले. नाईक यांनीही नाशिकच्या कलावंतांचे कौतुक करत त्यांनी आपल्या कलेचा समाजासाठी केलेला उपयोग वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. यावेळी प्रदर्शनाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कर्करोगाशी लढा देणाºया ‘त्या’ निरागस बालकांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. राज नगरकर यांनी केले व सूत्रसंचालन तन्वी अमीत यांनी केले.