शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कर्करोगाविषयी होणारी जनजागृती अपुरी सुभाष अवचट : एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:49 IST

नाशिक : कॅन्सर हा अत्यंत वाईट शब्द असून, या शब्दाचा संबंध माझ्या वहिनीच्या निधनाच्या वेळी मला अत्यंत जवळून आला. मातोश्रीसमान असलेल्या वहिनींना या आजाराने हिरावून नेले.

ठळक मुद्देरोगाचे समूळ उच्चाटन होऊन नियंत्रण मिळवायला हवेकलेचा समाजासाठी केलेला उपयोग वाखाणण्याजोगा

नाशिक : कॅन्सर हा अत्यंत वाईट शब्द असून, या शब्दाचा संबंध माझ्या वहिनीच्या निधनाच्या वेळी मला अत्यंत जवळून आला. मातोश्रीसमान असलेल्या वहिनींना या आजाराने हिरावून नेले. कर्करोगावर जनजागृती जरी सातत्याने होत असली तरी ती लोकसंख्येच्या तुलनेने अपुरी आहे. यासाठी सर्वांनी सर्वसमावेशक प्रयत्न करणे गरजेचे असून, या रोगाचे समूळ उच्चाटन होऊन नियंत्रण मिळवायला हवे, असे मत प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांनी व्यक्त केले. शहरातील सर्व कलाकारांनी आपल्या कलेद्वारे निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी व कर्करोगाशी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने चित्राकृती प्रदर्शनाच्या रूपाने सादर केल्या. ‘कलेवरील तुमचे प्रेम जीव वाचवू शकते’ या संकल्पनेनुसार चित्रकला प्रदर्शनाचे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये शनिवारी (दि.७) उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून अवचट उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री विनायकदादा पाटील, प्रा. अनिल नाईक, वसंत नगरकर, डॉ. राज नगरकर उपस्थित होते. यावेळी अवचट म्हणाले, कर्करोग मोठा आजार असला तरी या आजाराबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही, या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचार व अत्याधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. कलावंत हादेखील एक माणूसच असतो. नाशिकच्या कलावंतांनी त्यांच्यामधील ‘माणूस’ जिवंत ठेवत आपल्या कलेच्या माध्यमातून लहान मुलांना जीवदान देण्यासाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. मुळात नाशिकच्या मातीचे हे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. येथील लोकांमध्ये रसिकतेसोबत मानवी संवेदनाही तितक्याच जिवंतपणे दिसून येतात.विनायकदादा यांनी, नाशिकच्या मातीत समाजाची वीण गुंफण्यासाठी लागणारा माणुसकी व करुणेचा ओलावा टिकून असल्याचे सांगितले. नाशिक हे झपाट्याने प्रगती करणाºया शहरांपैकी एक आहे. नाशिकमध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयासारखी औषधोपचार करणारी व्यवस्था उपलब्ध होईल, असे कधीही वाटले नव्हते, असे ते यावेळी म्हणाले. नाईक यांनीही नाशिकच्या कलावंतांचे कौतुक करत त्यांनी आपल्या कलेचा समाजासाठी केलेला उपयोग वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. यावेळी प्रदर्शनाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कर्करोगाशी लढा देणाºया ‘त्या’ निरागस बालकांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. राज नगरकर यांनी केले व सूत्रसंचालन तन्वी अमीत यांनी केले.