शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

आंदोलनकर्त्यांची पदे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:38 IST

राजकीय आंदोलने करणाºया कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच झाला, मात्र त्याबाबत पोलीस आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने याबाबत कार्यवाहीच झाली नसल्याचे वृत्त आहे. परिणामी सत्तारूढ सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच याचा फटका बसला असून, गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना अगदी विशेष कार्य अधिकाºयापासून अन्य अनेक समित्यांपासून वंचित राहावे लागले आहे.

संजय पाठक ।नाशिक : राजकीय आंदोलने करणाºया कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच झाला, मात्र त्याबाबत पोलीस आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने याबाबत कार्यवाहीच झाली नसल्याचे वृत्त आहे. परिणामी सत्तारूढ सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच याचा फटका बसला असून, गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना अगदी विशेष कार्य अधिकाºयापासून अन्य अनेक समित्यांपासून वंचित राहावे लागले आहे.सामान्यत: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय होत असतो. राज्यात १९९५ मध्ये सर्व प्रथम सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला होता. राज्यात सर्वाधिक काळ विरोधात राहून संघर्ष केल्याने विविध राजकीय आंदोलनांचे गुन्हे सेना-भाजपाच्याच कार्यकर्त्यांवर दाखल होते. आताही तीच परिस्थती आहे. त्यामुळे भाजपा-सेनेची सत्ता आल्यानंतर गृहमंत्रालयाने अशाच प्रकारचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या आंदोलनात जीवित हानी झालेली नाही तसेच पाच लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, अशा गुन्ह्यांमधील कार्यकर्त्यांवरील दोष काढला जाऊ शकतो. १३ जानेवारी २०१५ मध्ये यासंदर्भात गृहखात्याने निर्णय घेताना पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. त्यात पोलीस उपआयुक्त (गुन्हे) हे सदस्य सचिव असतील तर सहायक संचालक, अभियोग संचालनालय हे सदस्य असतील अशी शहरी भागात तर ग्रामीण भागात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य सचिव तसेच अभियोग संचलनालयाचे सहायक संचालक हे सदस्य अशी समिती गठीत केली आहे. तथापि, गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये यासंदर्भात कार्यवाहीच झालेली नाही. त्याचा फटका सेना-भाजपाच्याच कार्यकर्त्यांना बसला आहे.