शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यांची पदे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:38 IST

राजकीय आंदोलने करणाºया कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच झाला, मात्र त्याबाबत पोलीस आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने याबाबत कार्यवाहीच झाली नसल्याचे वृत्त आहे. परिणामी सत्तारूढ सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच याचा फटका बसला असून, गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना अगदी विशेष कार्य अधिकाºयापासून अन्य अनेक समित्यांपासून वंचित राहावे लागले आहे.

संजय पाठक ।नाशिक : राजकीय आंदोलने करणाºया कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच झाला, मात्र त्याबाबत पोलीस आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने याबाबत कार्यवाहीच झाली नसल्याचे वृत्त आहे. परिणामी सत्तारूढ सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच याचा फटका बसला असून, गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना अगदी विशेष कार्य अधिकाºयापासून अन्य अनेक समित्यांपासून वंचित राहावे लागले आहे.सामान्यत: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय होत असतो. राज्यात १९९५ मध्ये सर्व प्रथम सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला होता. राज्यात सर्वाधिक काळ विरोधात राहून संघर्ष केल्याने विविध राजकीय आंदोलनांचे गुन्हे सेना-भाजपाच्याच कार्यकर्त्यांवर दाखल होते. आताही तीच परिस्थती आहे. त्यामुळे भाजपा-सेनेची सत्ता आल्यानंतर गृहमंत्रालयाने अशाच प्रकारचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या आंदोलनात जीवित हानी झालेली नाही तसेच पाच लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, अशा गुन्ह्यांमधील कार्यकर्त्यांवरील दोष काढला जाऊ शकतो. १३ जानेवारी २०१५ मध्ये यासंदर्भात गृहखात्याने निर्णय घेताना पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. त्यात पोलीस उपआयुक्त (गुन्हे) हे सदस्य सचिव असतील तर सहायक संचालक, अभियोग संचालनालय हे सदस्य असतील अशी शहरी भागात तर ग्रामीण भागात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य सचिव तसेच अभियोग संचलनालयाचे सहायक संचालक हे सदस्य अशी समिती गठीत केली आहे. तथापि, गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये यासंदर्भात कार्यवाहीच झालेली नाही. त्याचा फटका सेना-भाजपाच्याच कार्यकर्त्यांना बसला आहे.