शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

गावात आलेल्या नवीन व्यक्तींची माहिती देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 21:26 IST

एकलहरे : परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीकडून काटेकोर उपाययोजना केले जातात. मात्र नागरिकांना त्याचे गांभीर्य नाही असे दिसते. गावात किंवा आपल्या शेजारी अथवा धार्मिकस्थळात आलेल्या नवीन व्यक्तीची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. किंवा खरी माहिती दडविली जाते असे आढळून आले आहे.

एकलहरे : परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीकडून काटेकोर उपाययोजना केले जातात. मात्र नागरिकांना त्याचे गांभीर्य नाही असे दिसते. गावात किंवा आपल्या शेजारी अथवा धार्मिकस्थळात आलेल्या नवीन व्यक्तीची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. किंवा खरी माहिती दडविली जाते असे आढळून आले आहे.एकलहरे परिसरातील सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, ओढा, शिलापूर, लाखलगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी या परिसरातील कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, बचतगट प्रतिनिधी, आंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचे पथक तयार करून नागरिकांमध्ये अनेक माध्यमांतून जनजागृती केली जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषध फवारणी केली जाते. गावात नवीन व्यक्ती प्रवेश करू नये म्हणून रस्ते बंद केले जातात.ओढा ग्रामपंचायत हद्दीत १५ फेब्रुवारीनंतर मुलुंड, घाटकोपर, ठाणे, विलेपार्ले, मुंबई, औरंगाबाद, मालेगाव, पुणे या ठिकाणावरून २५ व्यक्ती आल्या. त्यातील बहुतेक १२ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान रेल्वे, बस, खासगी वाहनाने आले. यातील अनेकजण हिंदुस्थाननगर, ओढा शिवार येथे तर तीन जण ओढा येथे आले.या सर्वांना नोटिसा देऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हिंदुस्थाननगरमध्ये सुरू असलेले नवीन बांधकाम बंद करण्याची नोटीस तीन जणांना देण्यात आली आहे. मात्र विनापरवाना ओढा येथील एका धार्मिकस्थळात एक परदेशी व्यक्ती येऊन गेली. त्याची माहिती दडविण्यात आल्याने सरपंच विष्णू पेखळे, ग्रामसेवक गांगुर्डे व गावकऱ्यांनी शोध घेऊन त्या व्यक्तीस पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती मिळते. अशा अनोळखी व्यक्ती आपल्या परिसरात आल्यास त्वरित ग्रामपंचायतीस कळवावे, असे आवाहन ग्रामसेवक गांगुर्डे यांनी केले आहे.एकलहरे ग्रामपंचायत हद्दीत दंडे वसाहतीत नवीन पाच व्यक्ती आल्याची नोंद आहे. त्यापैकी एक व्यक्ती १२ मार्चला परदेशातून ओमान येथून तर उर्वरित चौघेजण २२ मार्चला आफ्रिका खंडातील टांझानिया येथून आले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती ग्राम विस्तार अधिकारी सुरेश वाघ यांनी दिली.जाखोरी ग्रामपंचायत हद्दीतील शेतीकामासाठी परजिल्ह्यातून आलेल्या १२ व्यक्तींची नोंद आहे. हे मजूर सोनवणे मळा येथे वास्तव्यास आहेत. कन्नड औरंगाबाद, चाळीसगाव, जळगाव, नांदगाव, नाशिक तालुक्यातील हे मजूर आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक उत्कर्ष पाटील यांनी दिली. या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाता येत नसल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जाखोरी परिसरात मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक