शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोमोबाइल क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:58 IST

मागील पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यातील जीएसटी असो वा नोटबंदी असो त्याचा थोड्याफार प्रमाणात फटका उद्योगक्षेत्राला आणि व्यावसायिकांना बसला आहे.

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

सातपूर : मागील पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यातील जीएसटी असो वा नोटबंदी असो त्याचा थोड्याफार प्रमाणात फटका उद्योगक्षेत्राला आणि व्यावसायिकांना बसला आहे.आता मोदी सरकार पुन्हा स्पष्ट बहुमतात सत्तेवर आले आहे. त्यामुळे साहजिकच अपेक्षा वाढल्या आहेत. भारतातील औद्योगिक उत्पादनाच्या ३४ टक्के वाटा असलेल्या आॅटोमोबाइल क्षेत्रासाठी सरकारने विशेष अर्थ योजना आणणे गरजेचे आहे. अशा अपेक्षा अखिल भारतीय आॅटोमोबाइल फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.विक्रेत्यांसाठीदेखील अर्थसंकल्पात धीर देणे गरजेचेवाहनांना लागणाºया सुट्या भागांच्या विक्रेत्यांसाठीदेखील अर्थसंकल्पात धीर देणे गरजेचे आहे. गॅरेज व्यावसायिकासह वाहन क्षेत्राशी संलग्न व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. या व्यावसायिकांच्या सरकारकडून अपेक्षा आहेत. दुचाकी वाहन हे सामान्य जनतेचे गरजेचे साधन आहे. यासाठी लागणारे सर्व सुटे भाग हे ५ टक्के जीएसटीमध्ये अंतर्भूत करावेत.- चंद्रकांत सानप, सचिवकौशल्य विकास योजना लागू करणे अपेक्षितउद्योगात वाहन उद्योगाची सर्वांत महत्त्वाची भूमिका ही या उद्योगात सक्रिय असलेले सुटे भाग विकणारे दुकानदार जे वाहन विकल्यानंतर विक्री पश्चात सेवा देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. यासोबत फार मोठ्या संख्येने संपूर्ण देशभरात कार्यरत असलेले वाहन दुरुस्ती करणारा कुशल कारागीर वर्ग जो असंघटित आहे आणि या कारागिरांसाठी कुठलीही सरकारी योजना नाही. या सर्वांना एकत्र आणून त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कौशल्य विकास योजना लागू करणे अपेक्षित आहे.- संजय सोनवणे, उपाध्यक्ष, अ. भा. आॅटोमोबाइल फेडरेशनइन्कम टॅक्सचा स्लॅब वाढवून दिलासा द्यावावाहनांचे सुटे भाग (स्पेअर पार्ट) विकणारे दुकानदार जे वाहन विकल्यानंतर विक्री पश्चात सेवा देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. असंख्य सुटे भाग हे अजून ही २८ टक्के जीएसटीमध्ये अंतर्भूत आहेत. सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन ते १८ टक्केमध्ये आणावा. तसेच इन्कम टॅक्सचा स्लॅब वाढवून छोट्या दुकानदारांना दिलासा द्यावा. भारतातील औद्योगिक उत्पादनाच्या ३४ टक्के वाटा असलेल्या आॅटोमोबाइल क्षेत्रासाठी सरकारने विशेष अर्थ योजना आणणे गरजेचे आहे.- कैलाश चावला, स्थानिक अध्यक्ष

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पNashikनाशिक