शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

जिल्ह्यात आजपासून लिलाव पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:37 IST

कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्याने निर्माण झालेली कोंडी फोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्यापाºयांनी सोमवारपासून (दि. १८) लिलाव सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

नाशिक : कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्याने निर्माण झालेली कोंडी फोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्यापाºयांनी सोमवारपासून (दि. १८) लिलाव सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.जिल्ह्यातील बंद पडलेल्या कांदा लिलावाची कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकाºयांसह शेतकरी व व्यापाºयांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी व्यापारी आणि शेतकºयांनी आयकर विभागाने बड्या कांदा व्यापाºयांवर छापे टाकून कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप केला. आयकर विभागाच्या छाप्यांमुळे मोठ्या व्यापाºयांवर कांदा खरेदी करण्यासाठी मर्यादा आल्याने कांद्याचे भाव घसरल्याचे सांगत व्यापाºयांनी साठवणूक मर्यादेच्या नियमाच्या अंमलबजावणीलाही विरोध केला. व्यापाºयांनी चढत्या दराने कांदा खरेदी केल्यानंतर साठवणुकीवर मर्यादा आणल्यास मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करतानाच सरकारने अशी बंदी तत्काळ लागू करू नये, अशी मागणीही व्यापाºयांनी यावेळी केली. तसेच अनेक लहान व्यापाºयांकडे साठवणूक क्षमता कमी असल्याने त्यांना लिलावात सोमवारपासून सहभागी होणे शक्य होणार नसल्याने असे व्यापारी एक-दोन दिवसात लिलावात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी शेतकºयांनाही एक-दोन दिवसांच्या अंतराने कांदा बाजारात आणण्याचे आवाहन केले. मात्र बाजारात पडून असलेल्या कांद्याचे लिलाव तत्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले. यावेळी जिल्ह्णातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव व चेअरमन बैठकीसाठी उपस्थित होते.कांद्याचे भाव व्यापारी नव्हे, तर निसर्ग आणि शासकीय धोरण निश्चित करीत असते. सरकारकडून कांद्याचे भाव वाढत असताना ते नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न होतात. परंतु, भाव कोसळल्यास कोणतीही यंत्रणा हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळेच कांदा बाजारात सरकारने हस्तक्षेप करू नये.- सोहनलाल भंडारी, जिल्हा कांदा व्यापारी संघटना, नाशिकव्यापाºयांच्या सर्व शंका व समस्यांचे निरसन करण्यात आले असून, त्यांना सोमवारपासून लिलाव सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्णातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू होणार असून, सर्व व्यापाºयांनी त्यात सहभाही व्हावे.- बी. राधाकृष्णन्, जिल्हाधिकारी, नाशिक