शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

शेतमाल लिलाव आजपासून बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:38 IST

बाजार समितीचा वजनकाटा सुरू करण्यासंदर्भात संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शेतमाल लिलाव सोमवारपासून (दि.२६) बेमुदत बंद ठेवण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे, तर शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये यासाठी पुढील निर्णय होईपर्यंत शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे.

नांदगाव : बाजार समितीचा वजनकाटा सुरू करण्यासंदर्भात संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शेतमाल लिलाव सोमवारपासून (दि.२६) बेमुदत बंद ठेवण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे, तर शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये यासाठी पुढील निर्णय होईपर्यंत शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे. शेतकºयांच्या मागणीनुसार बाजार समितीने स्वमाल-कीचा इलेक्ट्रिक वजनकाटा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला. वजनकाटा सुरू करण्यापूर्वी व्यापारी वर्गाला सूचना देण्यासाठी संचालक मंडळ व व्यापारी वर्गाची बैठक बोलावण्यात आली होती. सदर बैठकीत शेतकºयांच्या मागणीनुसार संचालक मंडळाने वजनकाटा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लिलावानंतर बाजार समितीच्या वजनकाट्यावर मोजलेल्या शेतमालाचे वजन व्यापारी वर्गास ग्राह्य धरावे लागेल. तसेच शेतकरी वर्ग आपल्या मर्जीनुसार बाजार समितीच्या अथवा व्यापारी वर्गाच्या वजनकाट्यावर वजन करेल अशी स्पष्ट भूमिका संचालक मंडळाने घेतली. सदर निर्णय मान्य नसल्याचे सांगत व्यापारी वर्गाने सोमवारपासून (दि. २६) लिलाव बेमुदत बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. बाबतचा अर्ज बाजार समिती प्रशासनाला देण्यात आला आहे. शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून पुढील निर्णय होईपर्यंत आपला शेतमाल विक्रीस आणू नये असे आवाहन सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे. वजनकाट्याला विरोध म्हणजे शेतकºयांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश चव्हाण व आम आदमीचे तालुकाध्यक्ष विशाल वडघुले यांनी केला आहे. नांदगाव बाजार समितीत वजनकाटा सुरु करण्याला विरोध करत व्यापाºयांनी बेमुदत लिलाव बंद पुकारला आहे. जे व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नाही त्या व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याची मागणी आम आदमी पार्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी सोमवारी (दि. २६) १० वाजता मार्केटमध्ये हजर राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नीलेश चव्हाण, आम आदमी पार्टीचे विशाल वघघुले यांनी केले आहे.

टॅग्स :market yardमार्केट यार्ड