शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

गणेशवाडीतील मंडईसाठी पुन्हा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:32 IST

गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटीतील गणेशवाडी येथील वापराविना पडून असलेल्या भाजीमंडईचा वापर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. आता या मंडईसाठी लवकरच लिलाव काढण्यात येणार आहेत.

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटीतील गणेशवाडी येथील वापराविना पडून असलेल्या भाजीमंडईचा वापर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. आता या मंडईसाठी लवकरच लिलाव काढण्यात येणार आहेत. यापूर्वी या मंडईसाठी काढण्यात आलेले लिलाव आणि वाटपाची प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याने आता किती विक्रेते त्यात सहभागी होतात, याकडे लक्ष लागून आहे.  पंचवटीत गोदाकाठी वर्षानुवर्षे भरणारा भाजीबाजार हटविण्यासाठी २००२-२००३ मध्ये हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांना हटविण्यात आले खरे परंतु हा बाजार पुन्हा वसल्याने अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, नूतन मंडईत या भाजीविक्रेत्यांना जागा देण्यासाठी त्यावेळी महापालिकेने ओट्यांचे लिलाव काढले होते. पंचवटी विभागीय कार्यालयात त्यासाठी सोडत काढण्यात आली होती. भाजीविक्रेत्यांनी त्यावर बहिष्कार टाकला असला तरी काही प्रमाणात विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता. मात्र त्यांनीही नंतर स्थलांतरला प्रतिसाद दिला नाही. गेल्या काही वर्षांपासून बाजार भरण्याच्या विरोधात महापालिकेने गोदा नदीच्या प्रदूषणाचे निमित्त करून पालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. तेव्हापासून भाजीबाजार भरणे बंद झाले आहे.फूलबाजार स्थलांतर शक्यभाजीमंडई बांधूनही वापराविना पडून असल्याने यापूर्वी महापालिकेने तेथे भाजीबाजार स्थलांतर ठरविले होते. मात्र, तेथे आवश्यक त्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. काही प्रमाणात फूलविक्रेते त्याठिकाणी व्यवसाय करतात, मात्र काही भाजीविक्रेते संबंधित विक्रेत्यांना धमकी देतात आणि व्यवसाय करण्यास प्रतिबंध करतात. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारीदेखील फूलविक्रेत्यांना ही जागा तात्पुरती असल्याचे सांगत असल्याने अडचण निर्माण होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका