शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

अबब, ४६ टन प्लास्टिक पिशव्या?

By admin | Updated: June 17, 2017 00:52 IST

नाशिक : पहिल्याच पावसाळ्यात अवघे शहर जलमय झाल्यानंतर नागरिकांच्या रोषातून वाचण्यासाठी प्लास्टिकवर खापर फोडून बांधकाम विभाग मोकळा झाला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पहिल्याच पावसाळ्यात अवघे शहर जलमय झाल्यानंतर नागरिकांच्या रोषातून वाचण्यासाठी प्लास्टिकवर खापर फोडून बांधकाम विभाग मोकळा झाला, परंतु आरोग्य विभागाने त्यावर कडी करत अवघ्या दोन दिवसांत शहरात ४५ टन प्लास्टिक कॅरीबॅग सापडल्याचा दावा आरोग्यविभागाने केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग शहरात दोन दिवसांत सापडल्या आणि त्या संकलित झाल्या हा सर्वच संशयास्पद भाग असून, कॅरीबॅगचा वापर नागरिक करीत असल्याचे सांगत प्रशासन जबाबदारी झटकत आहे.गेल्या बुधवारी (दि.१४) नाशिक शहरात सायंकाळी दीड तास झालेल्या पावसामुळे शहर जलमय झाले. शहरात पावसाळी गटार योजना अंमलात असताना आणि महापालिकेने पावसाळापूर्व कामांतर्गत नालेसफाईसह अन्य कामे केल्याचा दावा केला असताना हा प्रकार घडला आणि पालिकेचे पितळ उघडे पडले त्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर रोष व्यक्त होत असताना वेगवेगळ्या सबबी सांगितल्या जात आहेत. नागरिकांनी फेकलेल्या प्लास्टिक आणि कॅरीबॅग नाल्यांमध्ये आणि चेंबरच्या झाकणांमध्ये तुंबल्याने पाणी प्रवाही होऊ शकले नाही अशी भूमिका बांधकाम विभागाने केला आहे.