शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय शिक्षणपद्धती पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:50 IST

देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटूनही आजही याशिक्षण पद्धतीवर मॅकेलेचा आणि इंग्रजांचा प्रभाव दिसून येतो. मात्र भारतीय समाज, भाषा, वैचारिकता, कृषी पद्धती आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव शिक्षण व्यवस्थेत प्रतिबिंबित होत नसल्याची खंत व्यक्त करतानाच आपल्याला आॅक्सफर्ड, इंटरनशनल स्कूल महत्त्वाच्या की भारतीय गुरुकुलपद्धती गरजेची आहे. यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाल्यानेच भारतीय शिक्षण पद्धती पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे सदस्य डॉ. टी. व्ही. कट्टीमनी यांनी केले.

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक धोरणाविषयी कट्टीमनी यांचे मार्गदर्शन

नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटूनही आजही याशिक्षण पद्धतीवर मॅकेलेचा आणि इंग्रजांचा प्रभाव दिसून येतो. मात्र भारतीय समाज, भाषा, वैचारिकता, कृषी पद्धती आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव शिक्षण व्यवस्थेत प्रतिबिंबित होत नसल्याची खंत व्यक्त करतानाच आपल्याला आॅक्सफर्ड, इंटरनशनल स्कूल महत्त्वाच्या की भारतीय गुरुकुलपद्धती गरजेची आहे. यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाल्यानेच भारतीय शिक्षण पद्धती पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे सदस्य डॉ. टी. व्ही. कट्टीमनी यांनी केले.रावसाहेब थोरात सभागृहात भारतीय शिक्षण मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शाखेतर्फे ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, प्राचार्य अस्मिता वैद्य, आश्विनीकुमार भारद्वाज आदी उपस्थित होते. त्याचपद्धतीचे बदल शालेय तसेच उच्च शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच यावेळी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारतीय शिक्षण पद्धतीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे स्थान निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रूपाली जोडगेकर यांनी सूत्रसंचालक केले. विजय अवस्थी यांनी आभार मानले.विद्यार्थी केंद्रीय पद्धतकुलगुरू टी. व्ही. कट्टीमनी म्हणाले, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीयता, भारतीय जीवन, भारतीय संस्कृती यावर आधारित शिक्षण प्रणाली असणार आहे. भारतीय परंपरेतील बाबी पाठ्यपुस्तकात आल्या नसल्याने, भारतीय परंपरेचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले नाही. शिवाय विद्यार्थी केंद्र्रित शिक्षणपद्धतीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारताची समाजव्यवस्था, परंपरा आणि संस्कृती यावर भर आहे.भारतीय परंपरेचे ज्ञान नाहीकुलगुरू टी. व्ही. कट्टीमनी म्हणाले, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीयता, भारतीय जीवन, भारतीय संस्कृती यावर आधारित शिक्षण प्रणाली असणार आहे. भारतीय परंपरेतील बाबी पाठ्यपुस्तकात आल्या नसल्याने, भारतीय परंपरेचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले नाही. शिवाय विद्यार्थी केंद्र्रित शिक्षणपद्धतीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारताची समाजव्यवस्था, परंपरा आणि संस्कृती यावर भर आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणuniversityविद्यापीठ