शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची पळविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 9, 2016 00:31 IST

सिन्नर पंचायत समिती : बीडीओ नसल्याने खुुर्चीला तक्रारी सांगायच्या का?

 सिन्नर : गटविकास अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर पदभार कोणाकडेच नाही. तक्रारी काय खुर्चीला सांगायच्या का, असा संतप्त सवाल उपस्थित करीत पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करीत त्यांची खुर्ची खांद्यावर उचलून रस्ता धरला. काहीवेळात कर्मचाऱ्यांना सदर प्रकार माहीत झाल्यानंतर बैरागी यांच्या पाठीमागे पळत जात खुर्ची परत ताब्यात घेण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. या घटनेमुळे पंचायत समितीत एकच खळबळ उडाली होती. पांगरी येथील भाऊसाहेब नरहरी बैरागी यांनी गेल्या काही दिवसांपासून विहीर, घरकुल व अन्य घोटाळ्यासंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. बैरागी यांनी वेळोवेळी या प्रकरणांच्या चौकशीसाठी आंदोलने केली आहेत.पांगरी येथील एका प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात गटविकास अधिकाऱ्यांना आदेश केले असल्याचे बैरागी यांचे म्हणणे आहे. मात्र गटविकास अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यास टाळटाळ व विलंब केला जात असल्याचे बैरागी यांचे म्हणणे आहे. या कारवाईसाठी बैरागी गेल्या काही दिवसांपासून सिन्नर पंचायत समितीत चकरा मारत होते. येथील गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांची ४ आॅगस्ट रोजी बदली झाली. त्यांनी ६ तारखेला शनिवारी पदभार सोडला. त्यामुळे चार दिवसांपासून गटविकास अधिकाऱ्याचा पदभार कोणाकडे नव्हता. चकरा मारल्यानंतर कोणीच म्हणणे ऐकण्यासाठी नसल्याने बैरागी यांनी सोमवारी सकाळी सहाय्यक गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांची भेट घेतली. वाघ यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. मात्र दुपारी एक वाजेच्या सुमारास बैरागी यांच्या संयम सुटला. गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात कोणीच नसल्याचे पाहून बैरागी यांनी त्यांची लाकडी खुर्ची खांद्यावर उचलून घेतली. बैरागी खुुर्ची घेवून तडक पंचायत समितीच्या बाहेर निघाले. त्यानंतरही सदर प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. बैरागी थेट मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पोहचल्यानंतर कर्मचाऱ्यांचा सदर प्रकार लक्षात आला. कर्मचारी गणपत जाधव बैरागी यांच्या मागे पळत गेले व खुर्ची ताब्यात घेतली.पंचायत समितीतून गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची पळविण्याचा प्रकार झाल्याचा फोन गेल्यानंतर सिन्नर पोलिसांनी तात्काळ पंचायत समितीत धाव घेतली. त्यांनी बैरागी व अन्य दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. मात्र सायंकाळपर्यंत बैरागी यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही न आल्याने पोलिसांनी बैरागी यांनी सोडून दिले. (वार्ताहर)