शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे एटीएम, बँकांमध्येही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:02 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर नाशिक शहरातील सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी अधिक वाढविली असून, रस्त्यावर कामाशिवाय उतरणाऱ्या नागरिकांना कर्तव्यावर असलेले कर्मचारी पोलिसी खाक्या दाखवत असल्याने शहरातील आर्थिक नस बनलेल्या बँका आणि एटीएममध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.

ठळक मुद्देमोबाइल अ‍ॅपचा वापर : संसर्ग टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना पसंती

नाशिक : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर नाशिक शहरातील सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी अधिक वाढविली असून, रस्त्यावर कामाशिवाय उतरणाऱ्या नागरिकांना कर्तव्यावर असलेले कर्मचारी पोलिसी खाक्या दाखवत असल्याने शहरातील आर्थिक नस बनलेल्या बँका आणि एटीएममध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.कोरोनाच्या प्रभावामुळे शहरात असलेला पोलिसांचा बंदोबस्त आणि सोशल मीडियावर पोलिसांकडून नागरिकांना होणाºया मारहाणीचे व्हिडीओ यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण असून, सामान्य नागरिक बँका अथवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठीही घराबाहेर पडताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे एटीएम मशीनच्या माध्यमातून संसर्ग होण्याची भीतीही नागरिकांमध्ये असल्याने अनेकजण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, आॅनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. देशात ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर रोख स्वरूपात चलन टंचाई निर्माण झाल्याने अचानक मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार वाढले होते. त्यानंतर बाजारात चलन प्रवाह सुरळीत झाल्यानंतर हे प्रमाण सामान्य झाले होते. यात पुन्हा वाढ झाली आहे.शहरात कोणतीही आपत्ती असली तरी सुरुवातीला हाताशी काही पैसे असावे म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून एटीएम, बँकांमधून पैसे काढण्याची लगबग सुरू होते. परंतु, देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतरही नागरिकांकडून एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे.पैसे काढण्यासाठी नेहमी ग्राहकांची गर्दी होणाºया शहरातील मध्यवर्ती भागातील एटीएममध्येही सध्या शुकशुकाट असून, कोणाकडूनही थेट नोटांच्या स्वरूपात रोख रक्कम घेण्याऐवजी मोबाइल अ‍ॅपचा वापर करणाºया ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना अनेक नागरिकांनी स्वत:हून एटीएममधून पैसे काढणे टाळण्यास सुरुवात केली आहे. एटीएममध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी येणाºया-जाणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, प्रत्येकाचा स्पर्श मशीनला होत असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेकजण एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करणे टाळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक