शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

नास्तिक मेळावा : मानवजातीच्या समस्या श्रद्धेने सुटणे अशक्यच - शरद बेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 17:26 IST

‘नास्तिक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून शरद बेडेकर, कॉमे्रड किरण मोघे हे उपस्थित होते. यावेळी बेडेकर यांनी निरीश्वरवाद आणि ईश्वरी कल्पनेविषयी भूमिका मांडताना सांगितले, भारतात चार आणि पश्चिम आशियामध्ये चार असे एकूण आठ प्रमुख धर्म जगाच्या पाठीवर मानवाने निर्माण केले आहेत.

ठळक मुद्देविज्ञानाचा आधार घेत चिकित्सकवृत्तीने विचार केल्यास सुटतीलपृथ्वीवरील सर्व जाती-धर्माचा ईश्वर, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म या कल्पना वेगवेगळ्या कशा असू शकतात माणसाला नास्तिकता रूक्ष बनविते असे नाही

नाशिक : देव, धर्म या माणसाच्या डोक्यातील कल्पना असून, त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराच्या अस्तित्वाचा एकही पुरावा मिळून येत नाही किंवा आस्तिकांच्या ईश्वरी कल्पनेविषयीच्या युक्तिवादांपैकी एकही युक्तिवाद न पटणारा आहे. मानवजातीला आज भेडसावणाऱ्या समस्या श्रद्धेने सुटणार नाही तर त्या अधिक भयावह स्वरूप धारण करतील, असे प्रतिपादन तत्त्वज्ञान विषयक लेखन करणारे लेखक शरद बेडेकर यांनी केले.शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्यावर विवेकधारा संस्थेच्या वतीने रविवारी (दि.२५) गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात ‘नास्तिक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून शरद बेडेकर, कॉमे्रड किरण मोघे हे उपस्थित होते. यावेळी बेडेकर यांनी निरीश्वरवाद आणि ईश्वरी कल्पनेविषयी भूमिका मांडताना सांगितले, भारतात चार आणि पश्चिम आशियामध्ये चार असे एकूण आठ प्रमुख धर्म जगाच्या पाठीवर मानवाने निर्माण केले आहेत. मानवजातीला भेडसावणारे वर्तमानातील विविध प्रश्न हे श्रद्धेने सुटू शकत नाही तर विज्ञानाचा आधार घेत चिकित्सकवृत्तीने विचार केल्यास सुटतील, असे बेडेकर म्हणाले. जाती-धर्माच्या नावाने जगाच्या पाठीवर अन्याय, अत्याचार, मानवी युद्ध घडवून आणले जात असताना प्रेमळ, दयाळू देव हे सगळे का थांबवत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पृथ्वीवरील सर्व जाती-धर्माचा ईश्वर, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म या कल्पना वेगवेगळ्या कशा असू शकतात, अशी शंकाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. पुराणकथा सत्य मानत जगणारा वर्ग मोठा आहे व आपल्या सभोवताली घडणारे धार्मिक उत्सव व त्यांची व्यापकता त्यामुळे मोठ्या स्वरूपात जाणवते. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला जात-धर्म काहीही नसते; मात्र त्याचे संगोपनकर्ते व जन्मदात्यांमुळे त्याच्यावर जात-धर्म बिंबविला जातो. सत्यवादी दृष्टिकोनातून विज्ञानाचा आधार घेत मानवाने धर्मनिरपेक्ष नव्हे तर निरीश्वरवादी जीवनाचा स्वीकार केल्यास समाजातून सर्व दु:ख आणि समस्या नष्ट होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला. दरम्यान, लोके श शेवडे यांनी मुलाखतीदरम्यान, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, माणसाला नास्तिकता रूक्ष बनविते असे नाही तर आनंदी जीवन जगण्यासाठी व जीवनातील गोडवा टिकविण्यासाठी श्रध्देची नव्हे तर कलेवरील प्रेमाची गरज असते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक