शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नास्तिक मेळावा : मानवजातीच्या समस्या श्रद्धेने सुटणे अशक्यच - शरद बेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 17:26 IST

‘नास्तिक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून शरद बेडेकर, कॉमे्रड किरण मोघे हे उपस्थित होते. यावेळी बेडेकर यांनी निरीश्वरवाद आणि ईश्वरी कल्पनेविषयी भूमिका मांडताना सांगितले, भारतात चार आणि पश्चिम आशियामध्ये चार असे एकूण आठ प्रमुख धर्म जगाच्या पाठीवर मानवाने निर्माण केले आहेत.

ठळक मुद्देविज्ञानाचा आधार घेत चिकित्सकवृत्तीने विचार केल्यास सुटतीलपृथ्वीवरील सर्व जाती-धर्माचा ईश्वर, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म या कल्पना वेगवेगळ्या कशा असू शकतात माणसाला नास्तिकता रूक्ष बनविते असे नाही

नाशिक : देव, धर्म या माणसाच्या डोक्यातील कल्पना असून, त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराच्या अस्तित्वाचा एकही पुरावा मिळून येत नाही किंवा आस्तिकांच्या ईश्वरी कल्पनेविषयीच्या युक्तिवादांपैकी एकही युक्तिवाद न पटणारा आहे. मानवजातीला आज भेडसावणाऱ्या समस्या श्रद्धेने सुटणार नाही तर त्या अधिक भयावह स्वरूप धारण करतील, असे प्रतिपादन तत्त्वज्ञान विषयक लेखन करणारे लेखक शरद बेडेकर यांनी केले.शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्यावर विवेकधारा संस्थेच्या वतीने रविवारी (दि.२५) गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात ‘नास्तिक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून शरद बेडेकर, कॉमे्रड किरण मोघे हे उपस्थित होते. यावेळी बेडेकर यांनी निरीश्वरवाद आणि ईश्वरी कल्पनेविषयी भूमिका मांडताना सांगितले, भारतात चार आणि पश्चिम आशियामध्ये चार असे एकूण आठ प्रमुख धर्म जगाच्या पाठीवर मानवाने निर्माण केले आहेत. मानवजातीला भेडसावणारे वर्तमानातील विविध प्रश्न हे श्रद्धेने सुटू शकत नाही तर विज्ञानाचा आधार घेत चिकित्सकवृत्तीने विचार केल्यास सुटतील, असे बेडेकर म्हणाले. जाती-धर्माच्या नावाने जगाच्या पाठीवर अन्याय, अत्याचार, मानवी युद्ध घडवून आणले जात असताना प्रेमळ, दयाळू देव हे सगळे का थांबवत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पृथ्वीवरील सर्व जाती-धर्माचा ईश्वर, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म या कल्पना वेगवेगळ्या कशा असू शकतात, अशी शंकाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. पुराणकथा सत्य मानत जगणारा वर्ग मोठा आहे व आपल्या सभोवताली घडणारे धार्मिक उत्सव व त्यांची व्यापकता त्यामुळे मोठ्या स्वरूपात जाणवते. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला जात-धर्म काहीही नसते; मात्र त्याचे संगोपनकर्ते व जन्मदात्यांमुळे त्याच्यावर जात-धर्म बिंबविला जातो. सत्यवादी दृष्टिकोनातून विज्ञानाचा आधार घेत मानवाने धर्मनिरपेक्ष नव्हे तर निरीश्वरवादी जीवनाचा स्वीकार केल्यास समाजातून सर्व दु:ख आणि समस्या नष्ट होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला. दरम्यान, लोके श शेवडे यांनी मुलाखतीदरम्यान, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, माणसाला नास्तिकता रूक्ष बनविते असे नाही तर आनंदी जीवन जगण्यासाठी व जीवनातील गोडवा टिकविण्यासाठी श्रध्देची नव्हे तर कलेवरील प्रेमाची गरज असते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक