शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी जागेचे मूल्यांकन सुरू

By admin | Updated: May 5, 2017 00:38 IST

गटनिहाय ठरणार दर : मिळकतीचा मिळणार मोबदला

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा ताब्यात घेण्याची अधिसूचना जारी करून प्रशासनाने रस्त्यात जाणाऱ्या जागांचे गटनिहाय मूल्यांकन करण्यास सुरुवात केली असून, थेट खरेदीच्या माध्यमातून जागेचा ताबा घेण्यात येणार असला तरी, प्रत्येक गटासाठी वेगवेगळ्या दराची आकारणी केली जाणार आहे. त्यासाठी गेल्या तीन वर्षांत झालेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार तपासून पाहण्यात येत आहेत. या मार्गासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने अगोदर लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून जागा मालक शेतकऱ्यांची भागीदारी समृद्धी महामार्गासाठी घेण्याची तयारी दर्शविली होती. तथापि, नवनगरे उभारण्याबाबत असलेला संभ्रम व लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी शेतकरी अनुत्सुक असल्याने सरकारने लॅण्ड पुलिंगला पर्याय म्हणून भूसंपादन कायद्यान्वये जागा घेण्याची तयारी दर्शविली. तथापि, भूसंपादन कायदा २०१३ मधील काही तरतुदी व अटी पाहता शासनाच्या ताब्यात जागा मिळणे जवळपास अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर थेट खरेदीने जागेचा ताबा घेण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यात सरकार जागा मालकांकडून थेट खरेदी करेल व ताबा घेणार आहे. नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी या दोन्ही तालुक्यातील ४६ गावांमधून सुमारे ११० किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी बाराशे हेक्टरहून अधिक जागेची निकड आहे. महामार्गाचे सर्वेक्षण व मोजणीत कोणती जागा रस्त्यात जाणार याचा अंदाज प्रशासनाला आल्याने त्यांनी गटनिहाय जागेची किंमत काढण्यास सुरुवात केली आहे.त्यात प्रत्येक गाव व ताबा घेतल्या जाणाऱ्या गटाच्या लगत असलेल्या अन्य गटांमध्ये गेल्या तीन वर्षांत झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या गटांच्या किमती ठरल्यानंतर त्या गटात शेतकऱ्याचे असलेले पीक, झाडे, विहीर, घर-खळाचे बांधकाम आदि मालमत्तेचे स्वतंत्र मूल्यांकन केले जाणार आहे. त्यासाठी कृषी, सार्वजनिक बांधकाम खात्याची मदत घेतली जाणार असून, जागेची किंमत व त्यात मालमत्तेचे मूल्यांकन असे ठरवूनच एकत्रित किंमत काढली जाणार आहे. या किमतीनंतर सरकार २५ टक्के अधिकचा मोबदला देणार आहे. त्यामुळे प्रत्येक जागा मालकास वेगवेगळी किंमत या थेट खरेदीने मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती या मोबदल्याचा अंतिम निर्णय घेणार आहे. (प्रतिनिधी)‘समृद्धी’ विरोधाची भूमिका आज ठरणारसमृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास जागा मालक शेतकऱ्यांचा विरोध असतानाही राज्य सरकारने गटनिहाय थेट जागा खरेदीची अधिसूचना काढल्यामुळे सिन्नर व इगतपुरीच्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, यासंदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघर्ष समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच वृत्तपत्रातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जाहिरातीच्या माध्यमातून समृद्धी महामार्गात जमिनी जाणाऱ्या गाव व गटाची माहिती प्रसिद्ध केली जात असून, सध्याच्या बाजारभावापेक्षा २५ टक्के अधिक किंमत देऊन जागा खरेदीची अधिसूचना प्रसिद्धीस देण्यात आली आहे.