शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आचारसंहितेत अनुदान वाटपाचा अट्टाहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:35 IST

नाशिक : लोकसभेची आचारसंहिता सुरू असतानाही कृषी खात्याकडून पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान वाटप करण्याचा अट्टाहास धरला जात असून, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची खात्यासह बिनचूक माहिती तत्काळ पाठवा, असा आग्रह निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या महसूल यंत्रणेकडे धरला जात आहे. मुळात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर किसान योजनेचे अनुदान वाटप करणे आचारसंहितेचा भंग ठरणार असल्याचे माहीत असूनही कृषी खात्याने मात्र ज्या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान वाटप झाले, त्यांनाच पुन्हा अनुदान देण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्देयंत्रणा मेटाकुटीस : कृषी आयुक्तालयाकडून यंत्रणा धारेवर

नाशिक : लोकसभेची आचारसंहिता सुरू असतानाही कृषी खात्याकडून पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान वाटप करण्याचा अट्टाहास धरला जात असून, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची खात्यासह बिनचूक माहिती तत्काळ पाठवा, असा आग्रह निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या महसूल यंत्रणेकडे धरला जात आहे. मुळात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर किसान योजनेचे अनुदान वाटप करणे आचारसंहितेचा भंग ठरणार असल्याचे माहीत असूनही कृषी खात्याने मात्र ज्या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान वाटप झाले, त्यांनाच पुन्हा अनुदान देण्याचे ठरविले आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान किसान योजनेंतर्गत केली होती. सहा हजार रुपये प्रत्येकी दर तीन महिन्यांनी थेट शेतकºयांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात जानेवारी २०१९ पासून करण्यात आल्याने मार्च महिन्यात पात्र ठरलेल्या शेतकºयांची माहिती केंद्र सरकारने मागविली होती.प्रत्येक शेतकºयाच्या घरी जाऊन त्याचे खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक गोळा करून ते त्याच्या बॅँक खात्याशी संलग्न आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे काम तलाठ्यांमार्फत करण्यात आले व त्यानुसार अनुदानाचा पहिला हप्ता शेतकºयांना देण्यात आला. त्यानंतर संपूर्ण महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त झाली असे असताना गेल्या आठवड्यापासून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हप्ता शेतकºयांच्या खात्यावर टाकण्यासाठी कृषी खाते उत्साहात आले असून, तत्काळ शेतकºयांची माहिती पाठविण्यासाठी महसूल खात्याला दट्ट्या लावला आहे. नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यातच कृषी खात्याने महसूल यंत्रणेला माहितीसाठी वेठीस धरल्याने अगोदर निवडणुकीचे काम करावे की, कृषी खात्याचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. कृषी खात्याच्या या अट्टाहासामुळे महसूल यंत्रणा मेटाकुटीस आली असून, या कामावर बहिष्कार टाकण्याचा विचार करू लागली आहे.जिल्ह्यातील ४४ हजार शेतकरी पात्रया योजनेत नाशिक जिल्ह्णातील तीन लाख ४४ हजार शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी अकरा हजार शेतकºयांना सात टप्प्यांमध्ये निवडणुकीपूर्वी अनुदान वाटप करण्यात आले. मार्चच्या दुसºया आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने संपूर्ण महसूल यंत्रणा निवडणुकीच्या प्राधान्य कामात व्यस्त झाली. मुळातच कृषी खात्याची असलेल्या या योजनेची संपूर्ण माहिती महसूूल यंत्रणेकडून मागवून कृषी खात्याने स्वत:ची मान सोडवून घेतली आहे.