शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

आचारसंहितेत अनुदान वाटपाचा अट्टाहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:35 IST

नाशिक : लोकसभेची आचारसंहिता सुरू असतानाही कृषी खात्याकडून पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान वाटप करण्याचा अट्टाहास धरला जात असून, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची खात्यासह बिनचूक माहिती तत्काळ पाठवा, असा आग्रह निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या महसूल यंत्रणेकडे धरला जात आहे. मुळात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर किसान योजनेचे अनुदान वाटप करणे आचारसंहितेचा भंग ठरणार असल्याचे माहीत असूनही कृषी खात्याने मात्र ज्या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान वाटप झाले, त्यांनाच पुन्हा अनुदान देण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्देयंत्रणा मेटाकुटीस : कृषी आयुक्तालयाकडून यंत्रणा धारेवर

नाशिक : लोकसभेची आचारसंहिता सुरू असतानाही कृषी खात्याकडून पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान वाटप करण्याचा अट्टाहास धरला जात असून, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची खात्यासह बिनचूक माहिती तत्काळ पाठवा, असा आग्रह निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या महसूल यंत्रणेकडे धरला जात आहे. मुळात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर किसान योजनेचे अनुदान वाटप करणे आचारसंहितेचा भंग ठरणार असल्याचे माहीत असूनही कृषी खात्याने मात्र ज्या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान वाटप झाले, त्यांनाच पुन्हा अनुदान देण्याचे ठरविले आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान किसान योजनेंतर्गत केली होती. सहा हजार रुपये प्रत्येकी दर तीन महिन्यांनी थेट शेतकºयांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात जानेवारी २०१९ पासून करण्यात आल्याने मार्च महिन्यात पात्र ठरलेल्या शेतकºयांची माहिती केंद्र सरकारने मागविली होती.प्रत्येक शेतकºयाच्या घरी जाऊन त्याचे खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक गोळा करून ते त्याच्या बॅँक खात्याशी संलग्न आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे काम तलाठ्यांमार्फत करण्यात आले व त्यानुसार अनुदानाचा पहिला हप्ता शेतकºयांना देण्यात आला. त्यानंतर संपूर्ण महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त झाली असे असताना गेल्या आठवड्यापासून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हप्ता शेतकºयांच्या खात्यावर टाकण्यासाठी कृषी खाते उत्साहात आले असून, तत्काळ शेतकºयांची माहिती पाठविण्यासाठी महसूल खात्याला दट्ट्या लावला आहे. नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यातच कृषी खात्याने महसूल यंत्रणेला माहितीसाठी वेठीस धरल्याने अगोदर निवडणुकीचे काम करावे की, कृषी खात्याचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. कृषी खात्याच्या या अट्टाहासामुळे महसूल यंत्रणा मेटाकुटीस आली असून, या कामावर बहिष्कार टाकण्याचा विचार करू लागली आहे.जिल्ह्यातील ४४ हजार शेतकरी पात्रया योजनेत नाशिक जिल्ह्णातील तीन लाख ४४ हजार शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी अकरा हजार शेतकºयांना सात टप्प्यांमध्ये निवडणुकीपूर्वी अनुदान वाटप करण्यात आले. मार्चच्या दुसºया आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने संपूर्ण महसूल यंत्रणा निवडणुकीच्या प्राधान्य कामात व्यस्त झाली. मुळातच कृषी खात्याची असलेल्या या योजनेची संपूर्ण माहिती महसूूल यंत्रणेकडून मागवून कृषी खात्याने स्वत:ची मान सोडवून घेतली आहे.