शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

आशा कर्मचाऱ्यांना बीएलओंची कामे देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 19:11 IST

निवडणूक आयोगाची बहुतांशी व महत्त्वाची कामे आशा स्वयंसेविकांमार्फतच केली जातात. गावोगावची व प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयाची खडान्खडा माहिती आशा कर्मचाऱ्यांना असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांची बीएलओ म्हणून नेमणूक केली जाते.

ठळक मुद्देआरोग्य संचालकांचे पत्र : निवडणुकीचे काम रखडणार आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य मोहीम सुरू असल्यामुळे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ग्रामीण भागात गावोगावी शासनाच्या योजना पुरविण्याबरोबरच आरोग्य सेवा करणाºया आशा स्वयंसेविकांना निवडणुकीचे कामकाज न देण्याचा निर्णय आरोग्य संचालकांनी घेतला असून, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणूक आयोगाची बहुतांशी व महत्त्वाची कामे आशा स्वयंसेविकांमार्फतच केली जातात. गावोगावची व प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयाची खडान्खडा माहिती आशा कर्मचाऱ्यांना असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांची बीएलओ म्हणून नेमणूक केली जाते. बीएलओ म्हणून काम करताना मतदार नोंदणी करणे, मतदारांची माहिती गोळा करणे, त्यांची छायाचित्रे संकलित करणे, निवडणूक काळात मतदारांना मतचिठ्ठ्यांचे वाटप करणे आदी महत्त्वाची कामे आशा कर्मचारी करीत असतात. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून निवडणूक संबंधित कामे असल्यामुळे आजवर आशा कर्मचा-यांनी बीएलओंची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली असली तरी यंदा मात्र देशपातळीवर राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य मोहीम सुरू असल्यामुळे निवडणुकीच्या कामाइतकेच या कामाला शासनाने प्राधान्य दिले आहे. परंतु तत्पूर्वीच आशा कर्मचा-यांना निवडणूक कामांच्या नोटिसा बजावण्यात आल्यामुळे आरोग्य अभियान अडचणीत सापडले आहे. अशा परिस्थितीत राष्टÑीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. अनुपकुमार यादव यांनी सर्व जिल्हाधिका-यांना पत्र पाठवून आशा कर्मचा-यांना निवडणुकीचे कामकाज न देण्याच्या सूचना केल्या आहेत. यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण व नागरी भागात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरू असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आशा स्वयंसेविकेस विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच आशा स्वयंसेविकांना निश्चित करून दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यास त्यांना कामावर आधारित मोबदला अदा करण्यात येत आहे. राज्यातील नागरी व ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना निवडणूक संदर्भातील बीएलओ तसेच निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राष्टÑीय आरोग्य अभियान हे विशिष्ट कालावधीकरिता राबविण्यात येत असून, अभियानाचे काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. सदर उद्दिष्टपूर्तीकरिता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना निवडणूकविषयक कामकाजाच्या जबाबदा-या दिल्यामुळे त्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. तरी आशा स्वयंसेविकांना बीएलओ व इतर निवडणुकीचे कामकाज देण्यात येऊ नये.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद