शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:02 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर असलेल्या आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी, आशा कर्मचाºयांसोबत काम करणाºया गटप्रवर्तकांना मात्र शासनाने ठेंगा दाखविला आहे.

ठळक मुद्देआंदोलन मागे : गटप्रवर्तकांना वगळले

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर असलेल्या आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी, आशा कर्मचाºयांसोबत काम करणाºया गटप्रवर्तकांना मात्र शासनाने ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे आशा कर्मचाºयांप्रमाणे त्यांनाही शासनाने मानधन द्यावे, अशी मागणी करून मंगळवारी सर्व राज्यभर आशा कर्मचाºयांच्या वतीने शासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे.राष्टÑीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या आशा कर्मचाºयांना केंद्र सरकारकडून दरमहा दोन हजार रुपये मानधन दिले जात होते. मात्र या कर्मचाºयांकडून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडूनही अनेक कामे करून घेतली जात असताना त्याप्रमाणात मोबदला मात्र मिळत नव्हता. यासंदर्भात आशा कर्मचाºयांनी यापूर्वी आंदोलन केले असता शासनाने मानधन वाढविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती.राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही जारी होण्याची शक्यता असून, पुन्हा सरकारकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होण्याची शाश्वती नसल्याने आशा कर्मचाºयांनी ३ सप्टेंबरपासून राज्यस्तरीय आंदोलन सुरू केल्याने आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. या आंदोलनाची दखल घेत आरोग्य विभागाने सोमवारी रात्री उशिरा आशा कर्मचाºयांच्या मानधन वाढीचे आदेश जारी केले. त्यात राज्य सरकारकडून दीड हजार रुपये आशा कर्मचाºयांना त्यांच्या नियमित कामकाजाचे देणार असून, या व्यतिरिक्त ग्रामआरोग्य पोषण दिवस अंमलबजावणी करण्याच्या मोबदल्यात दोनशे रुपये, ग्रामआरोग्य, पोषण आणि स्वच्छता समितीची सभा बोलाविण्याच्या कामाचे दीडशे रुपये व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बैठकांना हजर राहण्याच्या मोबदल्यात दीडशे रुपये अशाप्रकारे दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. केंद्र सरकारचे दोन व राज्य सरकारचे दोन असे चार हजार रुपये आशा कर्मचाºयांना मिळणार आहेत त्यामुळे त्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.गटप्रवर्तक दुर्लक्षितआशा कर्मचाºयांच्या बरोबरीचे काम करणाºया गटप्रवर्तकांना मात्र मानधन दिलेले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. गटप्रवर्तकांना शासनाकडून दरमहा आठ हजार रुपये प्रवास भत्ता दिला जातो. त्यामानाने त्यांना कामेही खूप असल्याने त्यांनाही शासनाने मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसाGovernmentसरकार