शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत सहा दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 22:55 IST

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाचगाव योजना : बिल थकल्याने वीजपुरवठा केला खंडित

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी योजनेतून नांदूरशिंगोटे गावाला पाणीपुरवठा केला जातो. भोजापूर धरणातून पाच गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ तसेच बहुतांश नागरिक हे गावातच वास्तव्य करतात. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव योजनेतील पाण्याचा स्त्रोत आहे.गेल्या आठ वर्षांपासून गावात व वस्तीवर दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. वारंवार योजनेत बिघाड होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत असल्याचे प्रकार घडत आहेत.धरणात पाणी आहे तर वेळेवर वीजपुरवठा नाही. तर वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला तर विद्युत पंप पाणी उपसा करत नाही, तर काही ठिकाणी जलवाहिनी नादुरुस्त होते. त्यामुळे पाणीपुरवठा करताना नेहमीच अडचणी येत आहे. मात्र, नांदूरशिंगोटे येथील ग्रामस्थांना तसेच व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी वणवण होत असून विकत पाणी घ्यावे लागत आहे.गेल्या पाच ते सहा दिवसापासून गावात पाणीपुरवठा न झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाल्याने त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीपुरवठा योजनेची थकबाकी वाढत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापराच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. पाणीपुरवठा योजनेत पाच गावे असले तरी प्रामुख्याने नांदूरशिंगोटे व मानोरी या दोन ग्रामपंचायत योजनेत सहभाग असतो. त्यामुळे पाणीपुरवठा योजना चालविताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. पाणीपुरवठा समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहेत.स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठानांदूरशिंगोटे गावात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने महिलावर्गाचे हाल झाले होते. गावातील एका युवकाने ही बाब लक्षात घेऊन स्वखर्चातून काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून दिल्याने थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. युवा कार्यकर्ते राजेंद्र दराडे यांनी पदरमोड करत दोन दिवसांत एका टँकरने दहा ते बारा खेपा केल्या. त्यामुळे महिलांना पिण्यासाठी व वापरासाठी पाण्याचा आधार मिळाला आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgram panchayatग्राम पंचायत