शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत सहा दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 22:55 IST

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाचगाव योजना : बिल थकल्याने वीजपुरवठा केला खंडित

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी योजनेतून नांदूरशिंगोटे गावाला पाणीपुरवठा केला जातो. भोजापूर धरणातून पाच गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ तसेच बहुतांश नागरिक हे गावातच वास्तव्य करतात. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव योजनेतील पाण्याचा स्त्रोत आहे.गेल्या आठ वर्षांपासून गावात व वस्तीवर दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. वारंवार योजनेत बिघाड होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत असल्याचे प्रकार घडत आहेत.धरणात पाणी आहे तर वेळेवर वीजपुरवठा नाही. तर वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला तर विद्युत पंप पाणी उपसा करत नाही, तर काही ठिकाणी जलवाहिनी नादुरुस्त होते. त्यामुळे पाणीपुरवठा करताना नेहमीच अडचणी येत आहे. मात्र, नांदूरशिंगोटे येथील ग्रामस्थांना तसेच व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी वणवण होत असून विकत पाणी घ्यावे लागत आहे.गेल्या पाच ते सहा दिवसापासून गावात पाणीपुरवठा न झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाल्याने त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीपुरवठा योजनेची थकबाकी वाढत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापराच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. पाणीपुरवठा योजनेत पाच गावे असले तरी प्रामुख्याने नांदूरशिंगोटे व मानोरी या दोन ग्रामपंचायत योजनेत सहभाग असतो. त्यामुळे पाणीपुरवठा योजना चालविताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. पाणीपुरवठा समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहेत.स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठानांदूरशिंगोटे गावात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने महिलावर्गाचे हाल झाले होते. गावातील एका युवकाने ही बाब लक्षात घेऊन स्वखर्चातून काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून दिल्याने थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. युवा कार्यकर्ते राजेंद्र दराडे यांनी पदरमोड करत दोन दिवसांत एका टँकरने दहा ते बारा खेपा केल्या. त्यामुळे महिलांना पिण्यासाठी व वापरासाठी पाण्याचा आधार मिळाला आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgram panchayatग्राम पंचायत