शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मनेगावसह पाच गावांना कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:43 IST

सिन्नर : मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची समृद्धीच्या कामात तुटफूट झाल्याने भर उन्हाळ्यात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या ५ गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी मनेगावकरांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसिन्नर : समृद्धीच्या कामात जलवाहिनी फुटली

सिन्नर : मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची समृद्धीच्या कामात तुटफूट झाल्याने भर उन्हाळ्यात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या ५ गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी मनेगावकरांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.भोजापूर धरणातून २२ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेत मनेगाव, धोंडवीरनगर, पाटोळे, रामनगर, आटकवडे या पाच गावांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गावरील वॉलकम्पाउंडच्या सुरू असलेल्या कामात २२ पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. पाइपलाइन फुटल्यामुळे भर उन्हाळ्यात पाच गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाई जाणवू लागली आहे.फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यास ठेकेदाराने टाळाटाळ केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिलांवर ओढवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाच गावांतील रहिवाशांचे होणारे हाल संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तरीदेखील तुटलेल्या पाइपलाइनची जोडणी करण्यास ठेकेदार असमर्थ ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे जिकरीचे बनले आहे. तसेच मुरूम, माती वाहणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. त्याचाही त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत असल्याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे.वॉलकम्पाउंडच्या कामामुळे फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनात मुरकुटे यांच्यासह सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच सी. डी. भोजणे, रवींद्र काकड, भानुदास सोनवणे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.पाइपलाइन तातडीने दुरुस्त करा महामार्गाला वॉलकम्पाउंड करताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाइपलाइन फुटली. सदर पाइपलाइन ठेकेदाराने तातडीने दुरुस्त करणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्याची झळ मनेगावसह आटकवडे, रामनगर, धोंडवीरनगर, पाटोळे येथील रहिवाशांना बसली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. ठेकेदाराने सदर पाइपलाइन तातडीने दुरुस्त न केल्यास ग्रामस्थांना बरोबर घेऊन रस्त्याचे काम बंद पाडण्यात येईल.- राजाराम मुरकुटे, प्रदेश चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस 

टॅग्स :MIDCएमआयडीसीwater shortageपाणीकपात