शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

मनेगावसह पाच गावांना कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:43 IST

सिन्नर : मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची समृद्धीच्या कामात तुटफूट झाल्याने भर उन्हाळ्यात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या ५ गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी मनेगावकरांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसिन्नर : समृद्धीच्या कामात जलवाहिनी फुटली

सिन्नर : मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची समृद्धीच्या कामात तुटफूट झाल्याने भर उन्हाळ्यात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या ५ गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी मनेगावकरांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.भोजापूर धरणातून २२ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेत मनेगाव, धोंडवीरनगर, पाटोळे, रामनगर, आटकवडे या पाच गावांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गावरील वॉलकम्पाउंडच्या सुरू असलेल्या कामात २२ पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. पाइपलाइन फुटल्यामुळे भर उन्हाळ्यात पाच गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाई जाणवू लागली आहे.फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यास ठेकेदाराने टाळाटाळ केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिलांवर ओढवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाच गावांतील रहिवाशांचे होणारे हाल संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तरीदेखील तुटलेल्या पाइपलाइनची जोडणी करण्यास ठेकेदार असमर्थ ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे जिकरीचे बनले आहे. तसेच मुरूम, माती वाहणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. त्याचाही त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत असल्याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे.वॉलकम्पाउंडच्या कामामुळे फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनात मुरकुटे यांच्यासह सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच सी. डी. भोजणे, रवींद्र काकड, भानुदास सोनवणे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.पाइपलाइन तातडीने दुरुस्त करा महामार्गाला वॉलकम्पाउंड करताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाइपलाइन फुटली. सदर पाइपलाइन ठेकेदाराने तातडीने दुरुस्त करणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्याची झळ मनेगावसह आटकवडे, रामनगर, धोंडवीरनगर, पाटोळे येथील रहिवाशांना बसली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. ठेकेदाराने सदर पाइपलाइन तातडीने दुरुस्त न केल्यास ग्रामस्थांना बरोबर घेऊन रस्त्याचे काम बंद पाडण्यात येईल.- राजाराम मुरकुटे, प्रदेश चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस 

टॅग्स :MIDCएमआयडीसीwater shortageपाणीकपात