शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भालूरला कृत्रिम पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: May 30, 2014 01:31 IST

!मनमाड : भालूर गावाला पाणीपुरवठा करणार्‍या बंधार्‍याखालील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असले तरी ते पाणी पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतच नसल्याने भालूरकरांना तीव्र पाणी-टंचाईचा सामना करावा लागत आहे.

!मनमाड : भालूर गावाला पाणीपुरवठा करणार्‍या बंधार्‍याखालील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असले तरी ते पाणी पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतच नसल्याने भालूरकरांना तीव्र पाणी-टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही पाइपलाइन फोडून काही धनदांडग्या शेतकर्‍यांनी शेतीसाठी पाणी घेतल्याने मात्र पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आल्याची तक्रार करण्यात येत आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधान-कारक पावसामुळे भालूर गावाच्या पश्चिम शिवारात असलेल्या बंधार्‍यास व त्या खाली असलेल्या गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीला यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही केवळ नियोजनाअभावी भालूरकरांवर आज पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील पाण्याची टाकी व पाणीपुरवठा विहीर ही तीन कि.मी. अंतराची पाइपलाइन असून, याही पाइपलाइन फोडून काही शेतकर्‍यांनी शेतीसाठी पाणी घेतले असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असतानाही गावातील टाकीपर्यंत पाणी पोहोचू शकत नसल्याने टाकी पूर्ण भरली जात नाही. परिणामी अनेक भागांत नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योग्य नियोजनाअभावी पाच-सहा दिवसांनंतर येणारे पाणीही गावाच्या ठरावीक भागातील नळांना येत असले तरी काही भागांत मात्र पाणीच येत नसल्याने पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. महागडी पाणीपट्टी भरणार्‍यांना पाण्यासाठी स्टॅँडपोस्टवर पाण्यासाठी तासनतास उभे रहावे लागत असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)