शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भालूरला कृत्रिम पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: May 30, 2014 01:31 IST

!मनमाड : भालूर गावाला पाणीपुरवठा करणार्‍या बंधार्‍याखालील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असले तरी ते पाणी पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतच नसल्याने भालूरकरांना तीव्र पाणी-टंचाईचा सामना करावा लागत आहे.

!मनमाड : भालूर गावाला पाणीपुरवठा करणार्‍या बंधार्‍याखालील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असले तरी ते पाणी पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतच नसल्याने भालूरकरांना तीव्र पाणी-टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही पाइपलाइन फोडून काही धनदांडग्या शेतकर्‍यांनी शेतीसाठी पाणी घेतल्याने मात्र पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आल्याची तक्रार करण्यात येत आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधान-कारक पावसामुळे भालूर गावाच्या पश्चिम शिवारात असलेल्या बंधार्‍यास व त्या खाली असलेल्या गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीला यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही केवळ नियोजनाअभावी भालूरकरांवर आज पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील पाण्याची टाकी व पाणीपुरवठा विहीर ही तीन कि.मी. अंतराची पाइपलाइन असून, याही पाइपलाइन फोडून काही शेतकर्‍यांनी शेतीसाठी पाणी घेतले असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असतानाही गावातील टाकीपर्यंत पाणी पोहोचू शकत नसल्याने टाकी पूर्ण भरली जात नाही. परिणामी अनेक भागांत नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योग्य नियोजनाअभावी पाच-सहा दिवसांनंतर येणारे पाणीही गावाच्या ठरावीक भागातील नळांना येत असले तरी काही भागांत मात्र पाणीच येत नसल्याने पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. महागडी पाणीपट्टी भरणार्‍यांना पाण्यासाठी स्टॅँडपोस्टवर पाण्यासाठी तासनतास उभे रहावे लागत असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)