शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पावसाच्या आगमनाने पोळा उत्साहात

By admin | Updated: September 12, 2015 21:57 IST

आनंंद द्विगुणीत : येवल्यासह जिल्ह्यातील काही भागात तुफान पर्जन्यवृष्टी

नाशिक : जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचा पोळ्याचा आनंद द्विगुणीत झाला. निफाड, येवला, लासलगाव, विंचूर, मालेगाव, बागलाण आदि ठिकाणी पोळ्यानिमित्त बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. काही ठिकाणी दुष्काळाचा प्रभाव या सणावर दिसून आला तर विविध शाळांमध्येही पोळा साजरा करण्यात आला.सिन्नर : येथील एस. जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रीयन संस्कृती व परंपरांची माहिती व्हावी यासाठी थेट शाळेच्या आवारातच शेतशिवाराची उभारणी करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध शेतकरी गीते सादर करत पोळ्याचा आनंद लुटला.चूल, कंदील, दळणाचे जाते, विविध भांडी, बाज, शेतीची अवजारे, विहिरीची प्रतिकृती, मोटारसायकल, टॅँकर, शेतकरी, मळणी यंत्र, शेळी, गाय, बाजार आदि साहित्याची उत्तम मांडणी करून ग्रामीण संस्कृतीचे विद्यार्थ्यांना दर्शन घडविण्यात आले. सजविलेली बैलजोडी ढोलताशा व लेजीमच्या गजरात शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख, अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, नामदेव गडाख, मुख्याध्यापक उदय कुदळे, सोमनाथ थेटे यांच्या हस्ते पोळ्याचे तोरण तोडण्यात आले. जयश्री सोनजे यांनी आणलेल्या पुरणपोळी व गहू-गुळाचा नैवेद्य बैलांना खाऊ घालण्यात आला. यावेळी हलक्या कोसळणाऱ्या श्रावण सरींत ४० विद्यार्थ्यांच्या पथकाने झुंजुमुंजू पहाट झाली, सर्जा-राजा हलाम जोडी आदि शेतकरी गीतांवर नृत्याचा ठेका धरला. मुख्याध्यापक उदय कुदळे, विनायक काकुळते यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पिळकोस, परिसरात अद्याप पाऊस झालेला नसून खरीपही हाती येण्याची आशा दिसत नसल्यामुळे परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती ओढवल्याने पोळा सणावर दुष्काळाचे सावट दिसून आले. बहुतेक शेतकऱ्यांनी बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा केला. बैलांची सजावट करून, बैलांना गावातून मिरवून मारुतीचे दर्शन बैलांना दिले. यंदाचा दुष्काळ पेलवण्याची शक्ती दे तसेच चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली असल्यामुळे पावसासाठी साकडे घालण्यात आले. यंदाचा पोळा हा दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने फारसा उत्साह दिसत नसल्याचे सकाळपासून जाणवत होते. दरवर्षी दिसणारा उत्साह यंदा दिसून येत नव्हता.येवला : आज पोळ्याच्या दिवशीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परवापर्यंत आतुरतेने पावसाची शेतकरी वाट बघत असतानाच ऐन सणाच्या दिवशीच पाऊस आल्याने परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (लोकमत चमू)