शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘पंचक’विषयी सेनेची भूमिका वेगळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:17 IST

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात देशाला ‘पंचक’पासून मुक्त करण्याची इच्छा बोलून दाखविली होती; मात्र सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मनात ‘पंचक’चे उफाळून आलेले प्रेम अनाकलनीय असल्याचा टोला भाजपाचे राष्टय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात देशाला ‘पंचक’पासून मुक्त करण्याची इच्छा बोलून दाखविली होती; मात्र सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मनात ‘पंचक’चे उफाळून आलेले प्रेम अनाकलनीय असल्याचा टोला भाजपाचे राष्टय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत लगावला. बाळासाहेबांच्या वक्तव्याचा शिवसेनाला विसर पडल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.भाजपाची दिल्ली येथे नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शुक्ला हे राज्याच्या दौऱ्यावर आहे. यानिमित्त रविवारी त्यांनी शहराच्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधक हे परिवाराची लढाई लढत असल्याचे तर भाजप हा देश व देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढा देत असल्याचे म्हटले. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राबर्ट वढेरा, अहमद पटेल या पंचकपासून देश मुक्त करा, असे बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते; मात्र सध्या डोळ्यासमोर काही वेगळीच परिस्थिती आहे. या पंचकाविषयी सेनेचे उफाळलेले प्रेम बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यावर पाणी फिरविणारे असल्याचा आरोप शुक्ला यांनी यावेळी केला.२०१९ची निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असून, यंदाचे मिशन ३००पेक्षा अधिक जागांचे आहे आणि भाजपाचे कमळ या सर्व जागांवर फुलल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.तत्कालीन योजना पोहोचल्याच नाहीत...काँग्रेसच्या काळातील योजनांवर टीका करताना ज्या लाभार्थ्यांसाठी योजना काढल्या त्यांच्यापर्यंत त्याचा लाभ पोहचलाच नाही, उलट ज्यांना गरज नव्हती अशांनीच या योजनांच्या माध्यमातून मलिदा लाटल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात जनतेच्या योजना या जनतेपर्यंत थेट पोहचविल्या जात असून, गोरगरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. एकूणच मोदींच्या काळात सरकारी योजना अधिक बळकट झाल्या व लाभार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळाल्याचा दावा शुक्ला यांनी यावेळी बोलून दाखविला.

टॅग्स :Nashikनाशिक