शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

‘पंचक’विषयी सेनेची भूमिका वेगळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:17 IST

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात देशाला ‘पंचक’पासून मुक्त करण्याची इच्छा बोलून दाखविली होती; मात्र सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मनात ‘पंचक’चे उफाळून आलेले प्रेम अनाकलनीय असल्याचा टोला भाजपाचे राष्टय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात देशाला ‘पंचक’पासून मुक्त करण्याची इच्छा बोलून दाखविली होती; मात्र सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मनात ‘पंचक’चे उफाळून आलेले प्रेम अनाकलनीय असल्याचा टोला भाजपाचे राष्टय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत लगावला. बाळासाहेबांच्या वक्तव्याचा शिवसेनाला विसर पडल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.भाजपाची दिल्ली येथे नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शुक्ला हे राज्याच्या दौऱ्यावर आहे. यानिमित्त रविवारी त्यांनी शहराच्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधक हे परिवाराची लढाई लढत असल्याचे तर भाजप हा देश व देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढा देत असल्याचे म्हटले. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राबर्ट वढेरा, अहमद पटेल या पंचकपासून देश मुक्त करा, असे बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते; मात्र सध्या डोळ्यासमोर काही वेगळीच परिस्थिती आहे. या पंचकाविषयी सेनेचे उफाळलेले प्रेम बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यावर पाणी फिरविणारे असल्याचा आरोप शुक्ला यांनी यावेळी केला.२०१९ची निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असून, यंदाचे मिशन ३००पेक्षा अधिक जागांचे आहे आणि भाजपाचे कमळ या सर्व जागांवर फुलल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.तत्कालीन योजना पोहोचल्याच नाहीत...काँग्रेसच्या काळातील योजनांवर टीका करताना ज्या लाभार्थ्यांसाठी योजना काढल्या त्यांच्यापर्यंत त्याचा लाभ पोहचलाच नाही, उलट ज्यांना गरज नव्हती अशांनीच या योजनांच्या माध्यमातून मलिदा लाटल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात जनतेच्या योजना या जनतेपर्यंत थेट पोहचविल्या जात असून, गोरगरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. एकूणच मोदींच्या काळात सरकारी योजना अधिक बळकट झाल्या व लाभार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळाल्याचा दावा शुक्ला यांनी यावेळी बोलून दाखविला.

टॅग्स :Nashikनाशिक