शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सेना-मनसे युती; नाशकात ‘कभी नही’

By admin | Updated: January 28, 2017 23:38 IST

सैनिकांची मानसिकता : शिवसेनेकडून स्वबळाचा नारा

नाशिक : भाजपाशी काडीमोड घेण्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर आता सेना-मनसे युतीची चर्चा सुरू झाली असली तरी नाशिकमध्ये मात्र डुबत्या जहाजात बसण्याची शिवसेनेची मानसिकता दिसत नाही. शिवसैनिकांकडून स्वबळाचाच नारा दिला असताना दोन्ही ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हास बंधनकारक असल्याचे सेना-मनसेचे पदाधिकारी स्पष्ट करत आहेत. राज्यातील दहाही महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा प्रजासत्ताकदिनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आणि भाजपाशी काडीमोड घेतला. भाजपाशी फारकत घेतल्यानंतर आता शिवसेना-मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार काय, या चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत सेनेची ताकद असल्याने मुंबई सेनेने घ्यावी आणि नाशिक मनसेला द्यावे, अशीही कंडी पिकविली जात आहे. सेना-मनसे युतीची चर्चा म्हणा अथवा अफवा, नाशिकमध्ये मात्र, शिवसैनिकांकडून या युतीवर फुली मारली जात आहे. भाजपाशी युती तोडल्याचा आनंदोत्सव शिवसैनिकांकडून साजरा केला जात असतानाच आता पुन्हा युतीचे झेंगाट नको, अशी मानसिकता शिवसैनिकांमध्ये दिसून येत आहे. त्यातच, नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने सातत्याने मनसेला विरोध दर्शविला आहे. मनसेच्या नवनिर्माणाची खिल्ली उडवितानाच महापालिकेत सत्ताधारी मनसेला नेहमीच लक्ष्य केलेले आहे. मनसेची पुरती हवा गुल झालेली असल्याने या डुबत्या जहाजात कोण बसणार? असा सवालही सैनिक व्यक्त करत आहेत. मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी २८ नगरसेवकांनी पक्ष सोडलेला आहे. त्यात सर्वाधिक १७ नगरसेवक हे शिवसेनेत गेले आहेत. सेनेमध्येच मोठ्या प्रमाणावर इच्छुक असताना मनसेशी युती करून सैनिकांची नाराजी ओढवून घेण्यासारखे असल्याची चर्चा सुरू आहे.  शिवसैनिकांची युतीबाबत मानसिकता नसताना मनसैनिकांमध्ये मात्र सावध पवित्रा घेतला जात आहे. सेना-मनसेची युती झाल्यास महापालिकेवर सत्ता नक्की असल्याचेही म्हटले जात आहे, तर काही मनसैनिकांकडून स्वबळाचीच भाषा ऐकविली जात आहे. (प्रतिनिधी)