शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पश्चिमवर सेनेचा दावा भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:15 IST

जनआशीर्वादाच्या निमित्ताने निघालेल्या आदित्य ठाकरे यांच्या यात्रेमागे शिवसेनेचे राजकारण लपू शकलेले नसून, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघासाठी सेनेसाठी हमखास विजय मिळवून देणा-या मतदारसंघातच जाहीरसभा घेऊन शिवसैनिकांना चेतविण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिक : जनआशीर्वादाच्या निमित्ताने निघालेल्या आदित्य ठाकरे यांच्या यात्रेमागे शिवसेनेचे राजकारण लपू शकलेले नसून, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघासाठी सेनेसाठी हमखास विजय मिळवून देणा-या मतदारसंघातच जाहीरसभा घेऊन शिवसैनिकांना चेतविण्याचा प्रयत्न केला आहे.नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाचा विद्यमान आमदार असतानाही ठाकरे यांनी ‘विजयी संकल्प मेळावा’ घेऊन आगामी जागावाटपाचे संकेत दिले असून, त्यानिमित्ताने सेनेचा या मतदार संघावरचा दावा अधिक भक्कम मानला जात आहे. महाराष्टÑाच्या दौºयावर निघालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होऊन धुळेमार्गे तिचे नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. त्यानिमित्ताने मालेगाव बाह्य या शिवसेनेच्या सध्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. त्यापाठोपाठ ही यात्रा नांदगाव विधानसभा मतदारसंघात नेण्यात येऊन तेथेही ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. युतीच्या जागा वाटपात यापूर्वी शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या चांदवड मतदारसंघात या यात्रेचे जागोजागी स्वागत करण्यात आले, तर निफाड या सेनेच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघात ठाकरे यांचे पिंपळगाव, ओझर या प्रमुख गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक शहरात शुक्रवारी रात्री या यात्रेचे आगमन झाले.शनिवारी मात्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली. इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदारसंघातही यापूर्वी सेनेने विजय मिळविला आहे. नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघापैकी देवळाली या एकमेव मतदारसंघात शिवसेनेचा गेल्या पाच निवडणुकीपासून वर्चस्व कायम असल्यामुळे चेहडी येथील गोदावरी लॉन्स येथे आदित्य ठाकरे यांचा विजयी संकल्प मेळावा होणे साहजिकच असले तरी, नाशिक पश्चिम या मतदारसंघात ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे.इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्याखासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात नाशिक पश्चिम मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने हेमंत गोडसे यांना एक लाख दहा हजारांचे मताधिक्य दिले तसेच सेनेचे सर्वाधिक २१ नगरसेवक निवडून आलेले असल्याचे सांगून, अप्रत्यक्ष या मतदारसंघावर आपला हक्कच असल्याचे दाखवून दिले, तर आदित्य ठाकरे यांनीदेखील महाराष्टÑ काबीज करण्यासाठी नाशिकची सभा पश्चिम मतदारसंघातून घेत असल्याचे आवर्जून नमूद केले. सेना नेत्यांच्या या सभेने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या तर भाजपाच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.सध्या हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून, विद्यमान आमदार पुन्हा भाजपाकडून निवडणुकीची तयारी करीत आहे. दुसरीकडे या मतदारसंघातून शिवसेनेचे अनेक इच्छुक आहेत. त्यातही काही इच्छुकांचे मातोश्री व खासदार संजय राऊत यांच्याशी निकटचे संबंध असल्यामुळे ठाकरे यांची सभा या ठिकाणी घेण्यात आल्याचे मानले जात असले तरी, ही सभा यशस्वीतेची जबाबदारी इच्छुकांवरच सोपविण्यात आली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा