शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

सेना-भाजपात रस्सीखेच; मनसेची धडपड

By admin | Updated: February 19, 2017 00:24 IST

सेना-भाजपात रस्सीखेच; मनसेची धडपड

सातपूर : कामगारवर्गाने गेल्या निवडणुकीत भरभरून साथ दिल्यामुळे सिडको पाठोपाठ सातपूरला अव्वल जागा पटकाविणाऱ्या मनसेला गेल्या पाच वर्षांत लागलेल्या गळतीचा फायदा उठविण्यास सेना व भाजपामध्ये चुरस निर्माण झाली असून, त्यातही सेनेने उमेदवार देताना केलेली निवड त्यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. भाजपाला गेल्या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नसली तरी, यंदाच्या निवडणुकीत आयते का असेना दिलेल्या उमेदवारांमुळे मोठी आशा बाळगून आहे.  सातपूर या कामगार वसाहतीवर तसे म्हटले तर कोणा एका पक्षाचे वर्चस्व कधीच नव्हते, त्यामुळे कधी सेनेला, कॉँग्रेसला साथ देणाऱ्या सातपूरकरांनी गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवित, चौदापैकी सात जागा पदरात घातल्या, त्या खालोखाल दोन्ही कॉँग्रेसला जवळ केले व सेनेला अगदीच नाममात्र जागेवर ठेवले होते. परंतु पाच वर्षांत बदललेली राजकीय परिस्थिती, प्रभाग रचनेमुळे भौगोलिक परिस्थितीत झालेल्या बदलामुळे यंदाच्या निवडणुकीत सातपूरचे चित्र काहीसे वेगळे दिसू लागले आहे. मनसेच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकांनी पक्षाला अखेरपर्यंत साथ दिली, इतरांनी दुसरा घरोबा करीत पक्ष खिळखिळा करण्यात हातभार लावला आहे. त्यामुळे चालू निवडणुकीत पक्षाने प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी, निवडून येण्याच्या क्षमतेचा त्यात अभाव आहे, त्यामुळे घटणाऱ्या मनसेच्या जागांची भर का ढण्यास शिवसेना सरसावली आहे. ज्या पद्धतीने प्रभागात पॅनल करून उमेदवार देण्यात आले ते पाहता पक्ष म्हणून नव्हे तर उमेदवार म्हणून निवडून येणाऱ्यांचा लाभ सेनेला होणार आहे. भाजपाचीदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या या पक्षाची अवस्था पाच वर्षांपूर्वी अतिशय वाईट होती, एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नव्हता, परंतु म्हणतात ना सत्तेच्या पाठीशी सारे, त्याप्रमाणे पक्षाला आलेली भरती या निवडणुकीत कामी येणार आहे. सत्तेसाठी सेना व भाजपा यांच्यातच रस्सीखेच होईल असे सध्याचे अंतिम चित्र आहे. तथापि, कामगार वर्गाच्या मतांवर डोळा ठेवून माकपानेही सात जागांवर उमेदवार उभे केले आहेत. गेल्या निवडणुकीत या पक्षाला एक जागा मिळाली होती, ती या निवडणुकीत राखली तरी पुरेसे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दोन्ही कॉँग्रेसने निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच पराभूत मनोवृत्तीतून उमेदवार दिल्याने या पक्षाला चमत्कारच वाचवू शकतो, असे म्हटले तर वावगे होणार नाही.अपक्षांमुळे पक्षांना धोकासातपूर विभागात सोळा जागांपैकी अधिकाधिक जागा खेचून आणण्यासाठी  सेना-भाजपात रस्सीखेच असली तरी, या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने झालेली बंडखोरीदेखील दुर्लक्षून चालणार नाही. काही प्रभागांमध्ये अगदी निवडून येण्याची क्षमता नसलेल्या अपक्षांनी बंडखोरी केल्याचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याचीही तितकीच शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या पद्धतीने सातपूर विभागात राजकीय घडामोडी घडत आहेत, ते पाहता उमेदवार पक्षावर नव्हे तर स्वत:च्या हिमतीवर निवडून येतील, भले त्याचे श्रेय पक्षाने नंतर घेतले तरी चालेल !