शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

सेना-भाजपात रस्सीखेच; मनसेची धडपड

By admin | Updated: February 19, 2017 00:24 IST

सेना-भाजपात रस्सीखेच; मनसेची धडपड

सातपूर : कामगारवर्गाने गेल्या निवडणुकीत भरभरून साथ दिल्यामुळे सिडको पाठोपाठ सातपूरला अव्वल जागा पटकाविणाऱ्या मनसेला गेल्या पाच वर्षांत लागलेल्या गळतीचा फायदा उठविण्यास सेना व भाजपामध्ये चुरस निर्माण झाली असून, त्यातही सेनेने उमेदवार देताना केलेली निवड त्यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. भाजपाला गेल्या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नसली तरी, यंदाच्या निवडणुकीत आयते का असेना दिलेल्या उमेदवारांमुळे मोठी आशा बाळगून आहे.  सातपूर या कामगार वसाहतीवर तसे म्हटले तर कोणा एका पक्षाचे वर्चस्व कधीच नव्हते, त्यामुळे कधी सेनेला, कॉँग्रेसला साथ देणाऱ्या सातपूरकरांनी गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवित, चौदापैकी सात जागा पदरात घातल्या, त्या खालोखाल दोन्ही कॉँग्रेसला जवळ केले व सेनेला अगदीच नाममात्र जागेवर ठेवले होते. परंतु पाच वर्षांत बदललेली राजकीय परिस्थिती, प्रभाग रचनेमुळे भौगोलिक परिस्थितीत झालेल्या बदलामुळे यंदाच्या निवडणुकीत सातपूरचे चित्र काहीसे वेगळे दिसू लागले आहे. मनसेच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकांनी पक्षाला अखेरपर्यंत साथ दिली, इतरांनी दुसरा घरोबा करीत पक्ष खिळखिळा करण्यात हातभार लावला आहे. त्यामुळे चालू निवडणुकीत पक्षाने प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी, निवडून येण्याच्या क्षमतेचा त्यात अभाव आहे, त्यामुळे घटणाऱ्या मनसेच्या जागांची भर का ढण्यास शिवसेना सरसावली आहे. ज्या पद्धतीने प्रभागात पॅनल करून उमेदवार देण्यात आले ते पाहता पक्ष म्हणून नव्हे तर उमेदवार म्हणून निवडून येणाऱ्यांचा लाभ सेनेला होणार आहे. भाजपाचीदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या या पक्षाची अवस्था पाच वर्षांपूर्वी अतिशय वाईट होती, एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नव्हता, परंतु म्हणतात ना सत्तेच्या पाठीशी सारे, त्याप्रमाणे पक्षाला आलेली भरती या निवडणुकीत कामी येणार आहे. सत्तेसाठी सेना व भाजपा यांच्यातच रस्सीखेच होईल असे सध्याचे अंतिम चित्र आहे. तथापि, कामगार वर्गाच्या मतांवर डोळा ठेवून माकपानेही सात जागांवर उमेदवार उभे केले आहेत. गेल्या निवडणुकीत या पक्षाला एक जागा मिळाली होती, ती या निवडणुकीत राखली तरी पुरेसे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दोन्ही कॉँग्रेसने निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच पराभूत मनोवृत्तीतून उमेदवार दिल्याने या पक्षाला चमत्कारच वाचवू शकतो, असे म्हटले तर वावगे होणार नाही.अपक्षांमुळे पक्षांना धोकासातपूर विभागात सोळा जागांपैकी अधिकाधिक जागा खेचून आणण्यासाठी  सेना-भाजपात रस्सीखेच असली तरी, या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने झालेली बंडखोरीदेखील दुर्लक्षून चालणार नाही. काही प्रभागांमध्ये अगदी निवडून येण्याची क्षमता नसलेल्या अपक्षांनी बंडखोरी केल्याचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याचीही तितकीच शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या पद्धतीने सातपूर विभागात राजकीय घडामोडी घडत आहेत, ते पाहता उमेदवार पक्षावर नव्हे तर स्वत:च्या हिमतीवर निवडून येतील, भले त्याचे श्रेय पक्षाने नंतर घेतले तरी चालेल !