शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सेना, भाजपाच्या स्पर्धेत इतर पक्ष झाकोळले

By admin | Updated: February 24, 2017 01:44 IST

कार्यकर्त्यांचा जल्लोष : नाशिकच्या निकालाबरोबरच राज्याकडेही लक्ष

नाशिक : राज्यातील दहा महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांच्या कामगिरीकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष असल्याने निवडणुकीतील इतर पक्षांची कामगिरी झाकोळून गेली आहे. नाशिकमध्येही केवळ सेना आणि भाजप या दोनच पक्षांच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे मनसे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चाही होऊ शकली नाही. लहान पक्ष आणि इतर आघाड्यांचा तर या झंझावातात टिकाव लागू शकला नाही. महापालिका निवडणुकीत परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. सेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर राज्यात शिवसेना मोठा पक्ष असेल आणि नाशिकमध्येही शिवसेनाच सर्वाधिक जागा जिंकेल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु जसाजसा निकाल हाती येऊ लागले तसतसे चित्र बदलत गेले आणि अखेरच्या निकालापर्यंत सेना-भाजप या दोहोंमधील रस्सीखेचकडेच सर्वांचे लक्ष वेधले गेले. नाशिकप्रमाणेच राज्यातील इतर महापालिकांमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याने भाजपाच्या या लक्षवेधी कामगिरीने सारेच अचंबित झाले. नोटाबंदी, मराठा मोर्चाकडून बहिष्काराची भाषा, तिकिटासाठीचा घोडेबाजार, प्रचारातील घसरलेला स्तर याचा कोणताही परिणाम भाजपाच्या निकालावर दिसला नाही. नाशिकमध्ये सेनेने ११२ तर भाजपाने ११९ जागांवर उमेदवार उभे केले होते. मनसे ९७, राष्ट्रवादीने ५४, बसपाने ३२, माकपने १४, भाकपने २, एमआयएमने ९, समाजवादी पार्टीने ३, भारिपने १४, रिपाइंने ८, रिपाइं सेक्युलरने ४, रासपने ५, आंबेडकर राइट पार्टीने २, संभाजी ब्रिगेडने २, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने ३, भारतीय संग्राम परिषदेने ६, जनसुराज्य पक्षाने १ तर भारतीय जनहित कॉँग्रेसने १ याप्रमाणे उमेदवार उभे केले होते. परंतु सेना- भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाची चर्चाच शहरात होऊ शकली नाही. राष्ट्रवादी आणि कॉँग्रसने यश संपादन केले आहे. राष्ट्रवादीने पाच तर कॉँग्रेसने सहा ठिकाणी विजय मिळविला. मात्र त्यांचा विजयही झाकोळला गेला. इतर पक्षांना आपल्या विजयापेक्षा सेना- भाजप यांच्या जागांमध्ये किती वाढ होते आणि सत्तेच्या जवळ कोण पोहचतो याचीच अधिक काळजी दिसून आली. वास्तविक राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस पक्षाचा विजय हा या पक्षांच्या नेत्यांपेक्षा स्थानिक उमेदवारांच्या प्रभावावरच झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाही मात्र पक्ष म्हणून या विजयाची फारशी दखल घेण्यात आली नाही.