शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
5
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
6
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
7
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
8
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
10
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
11
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
12
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
13
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
14
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
15
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
16
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
17
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
18
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
19
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
20
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

नाशिकचे शिल्पज्ञ श्रीकृष्णाजी विनायक वझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 19:54 IST

शिल्पकलानिधि या उपाधाने गौरविलेल्या गेलेल्या वझेंची आज ३१ मार्च रोजी, नव्वदावी पुण्यतिथी आणि म्हणून हा लेखनप्रपंचाचा अंजली संजय वेखंडेचा अल्पसा प्रयास.

ठळक मुद्देउत्तर भागात अनेक प्रस्तर असलेला दगड सापडतोवेरूळ येथे भव्य अशा एकाच दगडात कोरलेले मंदिर आढळते.वझेंचा लेण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुहेरी आहे.

श्रीकृष्णाजी विनायक वझे, वेरूळ लेणीविषयी लिहितात,लेणी बघाया मग पांडवांचीगेलो वयस्यांसह मौज साचीअत्यंत रम्य स्थळ पाहता तेसंतोष झाला बहु मन्मनाते ।

सावरकरांच्या भावना आहेत या पांडवलेणी बघितल्यानंतरच्या. सावरकरांना नासिक जवळची त्रिरश्मी लेणी पाहूनआनंद वाटला कारण ती आपला इतिहास सांगते. सावरकरांची दृष्टी साहित्यिकाची आहे, पण काही अभ्यासकांनी यालेण्यांकडे ऐतिहासिक तर काहींची क्वचित् कला म्हणून पाहाण्याची. भारताच्या ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक मूल्यांच्यादृष्टिकोनातून लेण्यांचे महत्त्व अनन्यसाधारणच म्हंटले पाहिजे. महाराष्ट्रातील अशीच एक प्रसिद्ध लेणी म्हणजे वेरूळची लेणीहोय.नाशिक येथील, शिल्पकलानिधि या उपाधीने विभूषित श्री कृष्णाजी विनायक वझे हे मूळचे स्थापत्य अभियंता. आंग्लमाध्यमातून शिकलेले वझे जेव्हा पुण्याला सी ओ इ पी मधे स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण घेत होते, तेव्हा आपल्याकडेअसलेल्या लेण्या आणि धातूंचा वापर करून केलेल्या कलाकृतींचा अभ्यास कोणत्याही स्वरूपाने अभियंता-पाठ्यक्रमातशिकविला जात नाही अशी खंत त्यांच्या मनात निर्माण झाली आणि तिथून त्यांचा प्रवास सुरु झाला शिल्पशास्त्र अध्ययनाचा की त्याची परिणीती शिल्पशास्त्रावरील २७ पुस्तके लेखनात आणि अनेक शोधनिबंध लेखनात झालेली दिसते. एका अर्थाने, वझेंनी आपले संपूर्ण जीवन शिल्पशास्त्रातील संशोधनासाठी, या शास्त्राच्या पुनर्निर्माणासाठी वाहिले.हे सर्व स्मरणात यायचे कारण म्हणजे माझ्या वाचनात आलेले बाळासाहेब पंत प्रतिनिधि यांचे एलोरा हे पुस्तक होय.ह्या पुस्तकात मला वझेंनी वेरूळच्या लेण्यां विषयी केलेली एक प्रस्तावना वाचावयास मिळाली. वझेंची लेण्यांकडे बघण्याचीदृष्टी एका अभियंत्याची, स्थापत्यतज्ज्ञाची आहे. ते लिहितात की, कलेचे कोणतेही कार्य दोन मुद्द्यांवरुन पाहिले जाऊ शकते.१. कलात्मक कौशल्य आणि २. सामाजिक दृष्टीकोनाच्या मानदंडांद्वारे अनुमानित आणि न्याय्य केलेले.दोन्ही दृष्टीकोनात मोठा फरक आहे,जसे प्रथम मुद्यात, कलात्म कौशल्याबाबत, वक्र रेषा, प्रमाणबद्धता, नाजूकसजावटीची नक्काशी, पध्दतशीर नियोजन महत्वाचे; व दुसऱ्या मुद्याचा विचार करताना कला, सामाजिक, राजकीय,औद्योगिक आणि धार्मिक विचार आणि त्यांचे कार्य, ज्याने कार्य निष्पादित केले, त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ, आणि ज्या उद्देशाने त्याने ते केले या सगळ्यांचा विचार केला जातो. या दोन्हीही बाबींची तपासणी आणि काळजीपूर्वक विचार केल्यानंतर जे संदर्भ ,निष्कर्ष काढले जातात ते नेहमीच बरोबर असत नाहीत, तरीही सामान्यतः जसे अंदाजे काही प्रमाणात आपण लेखकांचे किंवा कवींचे मन, त्याच्या शब्दांचा वापर आणि वाक्यनिर्मिती वरून समजू शकतो त्याचप्रमाणे आपण वास्तुशास्त्राज्ञाचे काम, त्याची कल्पना निर्मिती समजावून घेऊ शकतो. यातून वास्तूच्या निर्माणामागील वास्तुतज्ज्ञाच्या मनाकडे, विचारांकडे वझे निर्देश करताना दिसतात.

पुढे ते म्हणतात की, आपण एखादी कला अवलोकन करतो तेव्हा तीन गोष्टी महत्वाच्या ठरतात. १) त्याची घनताकिंवा टिकाऊपणा. २) त्याची उपयुक्तता आणि ३) त्याची सुंदरता किंवा त्याचे आकर्षण. पहिल्या दोन घटकांचे महत्वआपण कमी आकलू शकत नाही, जरी कला सौंदर्य सर्वोच्च आहे. कला ही सुंदर तेव्हाच मानली जाते, जेव्हा ती वस्तूआकर्षक, टिकाऊ आणि उपयुक्त असेल. आपण सामाजिक दृष्टिकोनातून कला पाहतो, तेव्हा ती कोणत्या समयी घडविण्यात आली याचा विचार करावा लागतो. त्याच बरोबर निर्मातीच्या वेळी असलेले वातावरण, त्यावेळेस असलेल्या सामाजिक कल्पना, समाजात प्रचलित असलेले रीतिरिवाज याचा विचार करावा लागतो. कारण समाजात प्रचलित असलेले रीतिरिवाज आणि कल्पना कलेत परावर्तित होत असतात. कलेतून आपल्याला शिष्टाचाराची कल्पना, परंपरा, त्यांचे उद्दीष्ट आणि आदर्श तसेच कलाकाराची निर्माणक्षमता कळू शकते. कलेतून बघणाऱ्याला रोमांचित केले जाते.जेव्हा कलाकार एखादी कला शब्दात मांडू शकत नाही, तेव्हा तो ती गोष्ट चित्ररूपातून दर्शवितो. या सगळ्या वरील तत्वांचा उपयोग वेरूळ मधील लेणी कोरताना सुद्धा केलेला दिसतो. आपल्या या मुद्दयाचे सप्रमाण स्पष्टीकरणही ते देतात. ते म्हणतात की, टिकाऊपणाचा विचार केला तर भारतात गुहेतील खडकात निर्मिती फक्त दंडकारण्यात आढळते. याला कारण तेथील ज्वालामुखीचा खडक आहे. उत्तर भागात अनेक प्रस्तर असलेला दगड सापडतो. त्यामुळे दगडावरील नक्काशी काढणे , कोरणे कठीण जाते.वेरूळ येथे भव्य अशा एकाच दगडात कोरलेले मंदिर आढळते. विश्वनिर्मात्याच्या नियमानुसार येथे वजनदार भाग हावजनाने हलक्या भागाच्या खाली आढळतो. ही कलानिर्मिती करीत असताना , अतिशय काळजीपूर्वक निपुणतेने, संरचनेच्या मुख्य आणि किरकोळ भागांमध्ये असलेला संबंध आणि प्रमाण याचा विचार करून केला गेला आहे. याठिकाणी कलाकार हाआपल्या मनात येईल तसे दगडाला वळवू शकत नव्हता. छतावरील आकृत्या काढणे हे अत्यंत कठीण काम होते. छतावर कोरताना, कोरीव काम करताना उडणारे दगड डोळ्यात जाण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात होता. या मंदिरात हिवाळ्यात उबदार , उन्हाळ्यात थंड वाटते तसेच पावसाळ्यात पावसाचा त्रास जाणवत नाही. उपयुक्ततेचा विचार केला तर प्रत्येक समाजात, संसाराचे सुख आणि विचार सोडून देणाऱ्या, समाजाला प्रभावितकरणाऱ्या लोकांची आवश्यकता असते.अशा लोकांना एकांतवास आवश्यक भासतो. उपनिषदांच्या काळापासून (सुमारे4,000 इतिहासपूर्व काळ ) ते (17 व्या शतकापर्यंत ) समर्थ रामदासच्या काळापर्यंत सर्व महान विचारवंतांनीएकाकीपणावर भर दिला आहे. अशा विचारवंतांना या लेणींसारखी एकाकीतेची सर्वात उपयुक्त ठिकाणे होती. सौंदर्याचा विचार केला तर या लेणींमध्ये कलात्मक कौशल्य उत्कृष्ट आहे. जगभरातील पर्यटक आश्चर्यचकित झाले आहेत. लेणींमधील भव्य सभाम्डपे (हॉल), खांब आणि आकृत्यांची भव्यता स्वतः पाहिल्याशिवाय कळत नाही. येथे साकारलेल्या आकृतीचा पाय हा २ फूट ९ इंच आहे. तर उंची १६ ते २५ फूट आहे. यावर अनेक सरळ आणि वक्रित रेषामध्ये सजावटीची नक्षी कोरलेली आहे .यातील साहित्य हे लाकडासारखे मऊ आणि जोडण्यास सुलभ नाही किंवा धातूंप्रमाणे मोल्ड आणि कास्टमध्ये बनवू शकत नाही. चित्रे दगडांच्या गुहेच्या भिंतींवर चिकट पाण्याने रंगविलेली आहेत आणि ते नुकतीच काढलेली आहेत असे वाटते. भारतीय संस्कृती ही अतिशय प्राचीन आणि विलक्षण आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हिंदूंनी तारखांना महत्त्व दिले नाही. वेरूळ लेणी कुणी, केव्हा व कधी बांधली याचे कुठलाही तपशील आढळत नाहीत. तिथे आढळणाऱ्या शिलालेखाच्या अगोदर ही लेणी मात्र कोरली गेली होती. कोणी बांधली, किती मजूर लागले, कोणती यंत्रे वापरली या सर्व गोष्टी विचार करायला लावतात. असे मानले जाते की या लेणी साधारणतः इ.स. पूर्व २०० इ.स. ७०० पर्यंत बांधल्या गेल्या असाव्यात. इतक्या प्रगत तंत्रज्ञानाने वझे भारावून गेले आहेत असे त्यांच्या लेखनातून जाणवते. शेवटी ते म्हणतात की, एकंदर चित्राद्वारे वर्णन, वर्णनाद्वारे चित्रह्व अशी वेरूळची अप्रतिम कलाकृती आहे. वझेंचा लेण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुहेरी आहे. ते इतिहासाच्या दृष्टीने विचार करताना तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि लेण्यांतून दिसून येणारे स्थापत्य यांची सांगड घालताना दिसतात. त्याचवेळेस एका अभियंत्यांच्या दृष्टीने ती कशी उभारली गेली असावी असा तांत्रिक बाबींचा विचार करताना दिसतात आणि एका कलाकाराच्या दृष्टीने ही ते त्या लेण्यांकडे पहाताना दिसतात. ह्यातून त्यांचा अभ्यासच आपल्या नजरेत भरतो. वझेंनी स्वतः अभ्यासाने ही दृष्टी निर्माण केलेली आहे, आणि वेरूळ वरील त्यांच्या भाष्यांतून लेणी कशी पहावी याची मार्गदर्शिकाच ते आपल्याला देत आहेत असे वाटते.

- अंजली संजय वेखंडे

 

टॅग्स :Pandav cavesपांडवलेणीNashikनाशिकartकलाhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण