शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

वास्तुविशारदांनी दिला पालिकेला पाणी बचतीचा सल्ला

By admin | Updated: October 5, 2015 23:53 IST

वास्तुविशारदांनी दिला पालिकेला पाणी बचतीचा सल्ला

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३५ ते ४० टक्के गळती होत असून, ती कमी करण्यासाठी प्रबोधन आणि सक्तीचा मार्ग अवलंबताना फेडरल जोडणी ते मीटर याठिकाणापर्यंत लक्ष पुरवल्यास तूट कमी होऊन पाणी बचत होऊ शकते, असा सल्ला वास्तुविशारदांच्या संघटनेने दिला आहे.जागतिक वास्तुशास्त्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने नीलेश सोनवणे, पंकज पुंड, नीलेश वाघ, रसिक बोथरा आणि रोहिणी मराठे यांनी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा यांना निवेदन दिले. यात स्मार्ट सिटीच्या दृष्टीने अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने गंगापूर धरण आणि दारणा नदीतून ५ जलशुध्दीकरण केंद्र आणि ८५ जलकुंभाद्वारे तसेच ८५ जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाण्याची तूट ३५ ते ४० टक्के असून, तो चिंतेचा विषय आहे. धरण ते पाइपलाइन दरम्यानच सध्या १० ते १२ टक्के गळती होत असते. उर्वरित पाण्याची तूट ही व्हॉल्वमधील गळती, तोटी नसणे अशा अनेक बाबींमुळे होते. त्या पार्श्वभूमीवर सर्व नळांना तोट्या बसवण्यात याव्या, थोडे प्रबोधन करावे, तसेच फेडरल जोडणी ते ग्राहकाचे पाणी मीटर यातील पाईप जोड याचा विचार करून बचत केली जाऊ शकते. तसेच स्मार्ट सिटीसाठी ओला आणि सुका कचरा विलग करण्याचाही विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)