शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

वास्तुविशारदांनी दिला पालिकेला पाणी बचतीचा सल्ला

By admin | Updated: October 5, 2015 23:53 IST

वास्तुविशारदांनी दिला पालिकेला पाणी बचतीचा सल्ला

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३५ ते ४० टक्के गळती होत असून, ती कमी करण्यासाठी प्रबोधन आणि सक्तीचा मार्ग अवलंबताना फेडरल जोडणी ते मीटर याठिकाणापर्यंत लक्ष पुरवल्यास तूट कमी होऊन पाणी बचत होऊ शकते, असा सल्ला वास्तुविशारदांच्या संघटनेने दिला आहे.जागतिक वास्तुशास्त्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने नीलेश सोनवणे, पंकज पुंड, नीलेश वाघ, रसिक बोथरा आणि रोहिणी मराठे यांनी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा यांना निवेदन दिले. यात स्मार्ट सिटीच्या दृष्टीने अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने गंगापूर धरण आणि दारणा नदीतून ५ जलशुध्दीकरण केंद्र आणि ८५ जलकुंभाद्वारे तसेच ८५ जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाण्याची तूट ३५ ते ४० टक्के असून, तो चिंतेचा विषय आहे. धरण ते पाइपलाइन दरम्यानच सध्या १० ते १२ टक्के गळती होत असते. उर्वरित पाण्याची तूट ही व्हॉल्वमधील गळती, तोटी नसणे अशा अनेक बाबींमुळे होते. त्या पार्श्वभूमीवर सर्व नळांना तोट्या बसवण्यात याव्या, थोडे प्रबोधन करावे, तसेच फेडरल जोडणी ते ग्राहकाचे पाणी मीटर यातील पाईप जोड याचा विचार करून बचत केली जाऊ शकते. तसेच स्मार्ट सिटीसाठी ओला आणि सुका कचरा विलग करण्याचाही विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)