शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

नाशिक जिल्ह्यात वाळूतस्करीला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:23 IST

नाशिक जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूंचे ठिय्ये गेल्या तीन वर्षांपासून लिलावाविना पडून असून, सरकारच्या नवीन वाळू धोरणातील जाचक अटी, शर्तींमुळे ठिय्या घेण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनावर फेर लिलावाची वेळ येत आहे. सरकारी ठेका घेण्यापेक्षा गावकºयांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू चोरीवरच तस्करांचा अधिक भर

ठळक मुद्देनद्यांना पूर : पावसाळ्यामुळे बांधकामे बंदवाळूचोरीच्या घटनांमध्येही कमालीची घट

नाशिक : पावसाळ्यामुळे बंद पडलेली बांधकामे व नद्यांना आलेल्या पुरामुळे नाशिक जिल्ह्यात चोरी, छुप्या पद्धतीने दररोज केल्या जाणाऱ्या वाळूतस्करीला आपोआपच चाप बसला असून, गेल्या महिन्यात यासंदर्भात वाळूचोरीच्या घटनांमध्येही कमालीची घट झाली आहे.नाशिक जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूंचे ठिय्ये गेल्या तीन वर्षांपासून लिलावाविना पडून असून, सरकारच्या नवीन वाळू धोरणातील जाचक अटी, शर्तींमुळे ठिय्या घेण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनावर फेर लिलावाची वेळ येत आहे. सरकारी ठेका घेण्यापेक्षा गावकºयांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू चोरीवरच तस्करांचा अधिक भर असून, निर्माण झालेल्या वाळूच्या टंचाईमुळे गेल्या दोन वर्षांपासून वाळूचे ब्रासमागील दर दुपटीने वाढले आहेत. सध्या आठ ते नऊ हजार रुपये प्रती ब्रास असा वाळूचा दर आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी वाळू ठिय्यांमध्ये आता वाळूच शिल्लक नसल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण, महसूल विभागाने दिला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राची वाळूची गरज पूर्ण करण्यासाठी जळगाव, नंदुरबार, सारंगखेडा, कोपरगाव या भागातून तस्करी करून वाळू आणली जात आहे. नाशिकबरोबरच लगतच्या ठाणे व नवी मुंबईतदेखील ही वाळू पाठविली जात असून, नाशिक शहरात दररोज २०० ते २५० वाळूचे ट्रक चोरी, छुप्या मार्गाने रवाना होत असल्याची आकडेवारी आहे. त्यातून शासनाचे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असून यामागे वाळूतस्कर, पोलीस व महसूल खात्याची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे. वाळू तस्करांकडून महिन्याकाठी ‘हप्ते’ बांधून घेतल्यामुळे ठिय्यांतून यंत्राच्या सहाय्याने वारेमाप वाळू उपसा करण्यात आला. मात्र जुलै महिन्यापासून पावसाचे आगमन सुरू झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने उपसा करण्यात येणारे वाळू ठिय्ये पाण्याखाली गेले आहेत. अशातच पावसाळ्यामुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद करण्यात आल्यामुळेही वाळूची मागणी घटली, परिणामी वाळूतस्करांना आपोआपच चाप बसला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक