शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
5
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
6
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
7
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
8
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
9
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
10
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
11
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
12
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
13
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
14
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
15
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
16
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
18
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
19
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
20
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन

१९३२ कोटींच्या रोहयो आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:04 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या १९३२ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यावर तब्बल दोन तास चर्चेनंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. सन २०१६-१७ पासून रोहयोअंतर्गत अनेक लाभेच्छुकांना व्यक्तिगत विहिरींना मंजुरी देण्यात आली; परंतु त्यांचे काम सुरू झालेले नसल्याने पूर्वीच्या सर्व कामांचा त्यात समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केल्यानंतर पुरवणी नियोजनात त्याचा समावेश करण्याचे आश्वासन देण्यात आल्यावर सदस्यांनी आराखड्यास मंजुरी दिली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : विहिरींच्या प्रस्तावांचा समावेश

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या १९३२ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यावर तब्बल दोन तास चर्चेनंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. सन २०१६-१७ पासून रोहयोअंतर्गत अनेक लाभेच्छुकांना व्यक्तिगत विहिरींना मंजुरी देण्यात आली; परंतु त्यांचे काम सुरू झालेले नसल्याने पूर्वीच्या सर्व कामांचा त्यात समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केल्यानंतर पुरवणी नियोजनात त्याचा समावेश करण्याचे आश्वासन देण्यात आल्यावर सदस्यांनी आराखड्यास मंजुरी दिली.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत ग्रामपंचायत विभागाचेउपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी रोजगार हमी योजनेचा प्रस्तावित आराखडा मंजुरीसाठी मांडला. त्यावेळी झालेल्या चर्चेत यतिन पगार यांनी प्रश्न उपस्थित करून गेल्या वर्षीच्या रोहयोच्या दोनशे कोटी रुपयांच्या खर्चाच्या आराखड्यातून वर्षभरात फक्त ६० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले. त्यात जिल्ह्णात पाचच सामुदायिक विहिरींचे काम करण्यात आले, तर व्यक्तिगत विहिरींचे अवघे २४ प्रस्तावच प्राप्त झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर सभापती संजय बनकर, प्रवीण गायकवाड यांनी येवला तालुक्यातील ६५ विहिरी मंजूर करण्यात आल्या, परंतु त्यांचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगितले, तर रमेश बोरसे यांनी नांदगाव तालुक्यात ३६ विहिरी असून, मालेगाव तालुक्यातील दीडशे विहिरींबाबतही तसाच प्रकार असून अन्य तालुक्यांमध्ये विहिरी मंजूर होऊनही काम होऊ शकलेले नसल्याचे सांगितले. त्यामुळे नवीन आराखडा तयार करताना त्याची सविस्तर माहिती सदस्यांना दिली जावी त्याशिवाय आराखड्यास मंजुरी देऊ नये, अशी मागणी काही सदस्यांनी केली. मालेगाव तालुक्यातील विहिरींचे प्रस्ताव प्रलंबित असण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्णाला विहिरींचे दिलेले लक्षांक शंभर टक्के पूर्ण झाल्यामुळे नवीन विहिरींचे काम करू नये, असे शासनस्तरावरून सांगण्यात आले. त्यामुळे ८४ विहिरींचे काम सुरू करता आले नसल्याचे सांगितले, तर यतिन पगार यांनी, रोहयोसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असेल तर प्रत्येक सदस्याला त्याची माहिती देण्यात यावी, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या गावठाणाच्या जागेवर वनीकरणाचे कामे करण्यात यावे, रोहयोतून शाळा, रस्ते, पाणीपुरवठा आदी कामे करण्याला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केली. ग्रामीण भागात गोट फार्म, गायगोठा आदी कामांची मागणी होत असल्याने अशा कामांवर भर देण्यात यावा अशा सूचना करून या योजनेपासून वंचित राहिलेल्यांना प्राधान्य देऊन यापूर्वीच्या लाभेच्छुकांच्या विहिरींचा आराखड्यात समावेश करण्यात यावा, अशी सूचना अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली व आराखड्यास मंजुरी देण्यात आली.शिवसृष्टीसाठी जागा हस्तांतरजिल्हा परिषदेच्या मालकीची २८१२.०३ चौरस मीटर जागा सध्या येवला पंचायत समितीच्या ताब्यात असून, त्यावर गुदामे व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. मात्र सदरच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला असून, तशी जागेची मागणी त्यांनी पंचायत समितीकडे केली आहे. पंचायत समितीने देखील तसा ठराव केला असल्याने सदरची जागा बांधकाम खात्याकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

टॅग्स :zpजिल्हा परिषद