शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

४९३ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक; ध्वजारोहणाचाही मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:59 IST

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून, या पदावर राजकीय, सामाजिक व्यक्ती नेमण्यावरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या नेमणुका करण्यात आल्याने यातील काही प्रशासकांनी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण करण्याचा मानही मिळवला आहे.

ठळक मुद्दे राजकीय कार्यकर्ते हिरमुसले : जिल्हा परिषद प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून, या पदावर राजकीय, सामाजिक व्यक्ती नेमण्यावरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या नेमणुका करण्यात आल्याने यातील काही प्रशासकांनी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण करण्याचा मानही मिळवला आहे.कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशभर लॉकडाऊन पळाला जात असून, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मार्च महिन्यापासून सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत, त्याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या कामकाजावर झाला. अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मुदत संपल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार कोणी आणि कसा पहायचा, असा प्रश्न निर्माण होऊन गावाचा विकास खुंटला होता. शासनाच्या सूचनामुळे निवडणूक घेता येत नसल्यामुळे अखेर या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास शासनाने अनुमती दिली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून प्रशासकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या, मात्र अशा नेमणुका करताना गावाने एकमुखी नावाची शिफारस करावी व त्याला पालकमंत्री यांनी अनुमती द्यावी अशी अट घातली.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे साहजिकच सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षाशी संबंधित व्यक्ती ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमले जाणार असल्याची भीती व्यक्त करून विरोधी पक्षांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता. सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या असून, त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा आपल्या निर्णयात बदल करून ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची नेमणूक करावी, असे आदेश काढले.नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत सुमारे सहाशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मुदत संपुष्टात आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामविकासाठी ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारी व कर्मचाºयांना नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील ४९३ ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक केली. प्रशासक म्हणून नेमलेल्यांमध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य खात्याच्ये विस्तार अधिकारी, बांधकाम खात्याचे शाखा अभियंता यांचा समावेश आहे. प्रशासक नेमण्यात आल्याने गावातील प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. काही प्रशासकांनी पदभार स्वीकारून ध्वजारोहणही केले.

तालुकानिहाय नेमलेले प्रशासक

येवला- ३९दिंडोरी- ७सिन्नर- ९८इगतपुरी- २चांदवड- ५२देवळा- ९त्रंबकेश्वर- २नांदगाव- ५५नाशिक- २५निफाड- ६२बागलाण- ३२मालेगाव- ९९.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक