शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्ज स्विकारणार : कृष्णकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 15:35 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शिक्षण विभागाने परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने नाशिक विभागातील नाशिकसह , नंदुरबार, धुळे व जळगाव या चारही जिल्हयांमध्ये सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी सुरू झाली आहे.त्यापार्श्वूभूमीवर विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांच्याशी साधलेला संवाद

ठळक मुद्देदहावी, बारावी परीक्षांचे नियोजन सुरू आवश्यकता भासल्यास परीक्षा केंद्र वाढवणार विभागीय अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांची माहिती

नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी , बारावीच्या परीक्षांचे काय होणार याविषयी निर्माण झालेली साशंकता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने संपुष्टात आली आहे. तसेच नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारीही सुरू केली आहे. या परीक्षेपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विविध अडचणींमुळे निर्धारीत वेळेत अर्ज करू न शकेलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज स्विकारले जाणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी ‘लोकमत ’शी स्पष्ट केले आहे.

प्रश्न : कोरोनाच्या संकटात दहावी बारावीच्या परीक्षांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे, या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन ?पाटील : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.त्यानुसार ऑफलाईन परीक्षांचे नियोजन विभागीय शिक्षण मंडळाने सुरू केले असून याविषयी विद्यार्थी व पालकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय परीक्षेची तयारी करावी, ताण तणावरहीत परीक्षेसाठी विभागीय मंडळही प्रयत्नशील आहे.प्रश्न : नाशिक विभागातून किती विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होऊ शकतील, याविषयी विभागीय मंडळाचा अंदाज काय आहे?पाटील : नाशिक विभागातून दहावी, बारावीचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संध्या वाढू शकेल. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी परीक्षेच्या एक दिवस अगोदपर्यंंत विभागीय मंडळाकडून परीक्षा अर्ज स्विकारले जाणार आहेत.प्रश्न : गतवर्षाच्या तुलनेत यावरर्षी दहावी बारावीच्या परीक्षार्थींची संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे , या मागे काय कारण असून शकते ?पाटील : परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थी संख्येत काही प्रमाणात घट दिसत असली तरी अजूनही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मूदत आहे. अनेक विद्यार्थी अजूनही अर्ज सादर करीत आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्ती वाढण्याची शक्यता आहे. तर कोरोना काळात अनेक कुटुंब स्थलांतरीत झाले असून त्यांच्या सोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाल्याने काही प्रमाणात संख्या घटली आहे, मात्र ही संख्या फारच कमी आहे.प्रश्न : परीक्षेच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन व्हावे यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार आहे का ?पाटील : शासनाच्या सुचनेनुसार विभागीय मंडळाकडून परीक्षेचे नियोजन सुरू आहे. यात विद्यार्थी सुरक्षेसाठी परीक्षा केंद्र वाढविण्याची वेळ आली तर परीक्षा केंद्रही वाढविण्यात येतील. विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शा‌ळेमध्ये विद्यार्थी मास्क वापरत असून परीक्षांनाही विद्यार्थी मास्क वापरतील. त्याचप्रमाणे सर्व केंद्रांवर निर्जंतकीकरण व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी भीतीमुक्त, तणाव विरहीत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा यशस्वी करण्याचा विभागीय मंडळाचा निर्धार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC / 12th Exam12वी परीक्षा