शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

दहावी, बारावी परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्ज स्विकारणार : कृष्णकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 15:35 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शिक्षण विभागाने परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने नाशिक विभागातील नाशिकसह , नंदुरबार, धुळे व जळगाव या चारही जिल्हयांमध्ये सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी सुरू झाली आहे.त्यापार्श्वूभूमीवर विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांच्याशी साधलेला संवाद

ठळक मुद्देदहावी, बारावी परीक्षांचे नियोजन सुरू आवश्यकता भासल्यास परीक्षा केंद्र वाढवणार विभागीय अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांची माहिती

नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी , बारावीच्या परीक्षांचे काय होणार याविषयी निर्माण झालेली साशंकता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने संपुष्टात आली आहे. तसेच नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारीही सुरू केली आहे. या परीक्षेपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विविध अडचणींमुळे निर्धारीत वेळेत अर्ज करू न शकेलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज स्विकारले जाणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी ‘लोकमत ’शी स्पष्ट केले आहे.

प्रश्न : कोरोनाच्या संकटात दहावी बारावीच्या परीक्षांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे, या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन ?पाटील : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.त्यानुसार ऑफलाईन परीक्षांचे नियोजन विभागीय शिक्षण मंडळाने सुरू केले असून याविषयी विद्यार्थी व पालकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय परीक्षेची तयारी करावी, ताण तणावरहीत परीक्षेसाठी विभागीय मंडळही प्रयत्नशील आहे.प्रश्न : नाशिक विभागातून किती विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होऊ शकतील, याविषयी विभागीय मंडळाचा अंदाज काय आहे?पाटील : नाशिक विभागातून दहावी, बारावीचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संध्या वाढू शकेल. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी परीक्षेच्या एक दिवस अगोदपर्यंंत विभागीय मंडळाकडून परीक्षा अर्ज स्विकारले जाणार आहेत.प्रश्न : गतवर्षाच्या तुलनेत यावरर्षी दहावी बारावीच्या परीक्षार्थींची संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे , या मागे काय कारण असून शकते ?पाटील : परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थी संख्येत काही प्रमाणात घट दिसत असली तरी अजूनही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मूदत आहे. अनेक विद्यार्थी अजूनही अर्ज सादर करीत आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्ती वाढण्याची शक्यता आहे. तर कोरोना काळात अनेक कुटुंब स्थलांतरीत झाले असून त्यांच्या सोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाल्याने काही प्रमाणात संख्या घटली आहे, मात्र ही संख्या फारच कमी आहे.प्रश्न : परीक्षेच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन व्हावे यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार आहे का ?पाटील : शासनाच्या सुचनेनुसार विभागीय मंडळाकडून परीक्षेचे नियोजन सुरू आहे. यात विद्यार्थी सुरक्षेसाठी परीक्षा केंद्र वाढविण्याची वेळ आली तर परीक्षा केंद्रही वाढविण्यात येतील. विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शा‌ळेमध्ये विद्यार्थी मास्क वापरत असून परीक्षांनाही विद्यार्थी मास्क वापरतील. त्याचप्रमाणे सर्व केंद्रांवर निर्जंतकीकरण व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी भीतीमुक्त, तणाव विरहीत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा यशस्वी करण्याचा विभागीय मंडळाचा निर्धार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC / 12th Exam12वी परीक्षा