शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दहावी, बारावी परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्ज स्विकारणार : कृष्णकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 15:35 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शिक्षण विभागाने परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने नाशिक विभागातील नाशिकसह , नंदुरबार, धुळे व जळगाव या चारही जिल्हयांमध्ये सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी सुरू झाली आहे.त्यापार्श्वूभूमीवर विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांच्याशी साधलेला संवाद

ठळक मुद्देदहावी, बारावी परीक्षांचे नियोजन सुरू आवश्यकता भासल्यास परीक्षा केंद्र वाढवणार विभागीय अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांची माहिती

नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी , बारावीच्या परीक्षांचे काय होणार याविषयी निर्माण झालेली साशंकता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने संपुष्टात आली आहे. तसेच नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारीही सुरू केली आहे. या परीक्षेपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विविध अडचणींमुळे निर्धारीत वेळेत अर्ज करू न शकेलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज स्विकारले जाणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी ‘लोकमत ’शी स्पष्ट केले आहे.

प्रश्न : कोरोनाच्या संकटात दहावी बारावीच्या परीक्षांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे, या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन ?पाटील : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.त्यानुसार ऑफलाईन परीक्षांचे नियोजन विभागीय शिक्षण मंडळाने सुरू केले असून याविषयी विद्यार्थी व पालकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय परीक्षेची तयारी करावी, ताण तणावरहीत परीक्षेसाठी विभागीय मंडळही प्रयत्नशील आहे.प्रश्न : नाशिक विभागातून किती विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होऊ शकतील, याविषयी विभागीय मंडळाचा अंदाज काय आहे?पाटील : नाशिक विभागातून दहावी, बारावीचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संध्या वाढू शकेल. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी परीक्षेच्या एक दिवस अगोदपर्यंंत विभागीय मंडळाकडून परीक्षा अर्ज स्विकारले जाणार आहेत.प्रश्न : गतवर्षाच्या तुलनेत यावरर्षी दहावी बारावीच्या परीक्षार्थींची संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे , या मागे काय कारण असून शकते ?पाटील : परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थी संख्येत काही प्रमाणात घट दिसत असली तरी अजूनही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मूदत आहे. अनेक विद्यार्थी अजूनही अर्ज सादर करीत आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्ती वाढण्याची शक्यता आहे. तर कोरोना काळात अनेक कुटुंब स्थलांतरीत झाले असून त्यांच्या सोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाल्याने काही प्रमाणात संख्या घटली आहे, मात्र ही संख्या फारच कमी आहे.प्रश्न : परीक्षेच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन व्हावे यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार आहे का ?पाटील : शासनाच्या सुचनेनुसार विभागीय मंडळाकडून परीक्षेचे नियोजन सुरू आहे. यात विद्यार्थी सुरक्षेसाठी परीक्षा केंद्र वाढविण्याची वेळ आली तर परीक्षा केंद्रही वाढविण्यात येतील. विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शा‌ळेमध्ये विद्यार्थी मास्क वापरत असून परीक्षांनाही विद्यार्थी मास्क वापरतील. त्याचप्रमाणे सर्व केंद्रांवर निर्जंतकीकरण व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी भीतीमुक्त, तणाव विरहीत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा यशस्वी करण्याचा विभागीय मंडळाचा निर्धार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC / 12th Exam12वी परीक्षा