शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

घोषणा लांबणीवर; राष्टÑवादीत घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:39 IST

कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या जागा वाटपात नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला सोडण्यात आल्याने या दोन्ही जागांवर संभाव्य उमेदवारांची नावे मतदारात चर्चिली जाऊन त्यादृष्टीने त्यांनी प्रचाराला सुरुवातही केलेली असताना पक्षाने गुरुवारी जाहीर केलेल्या राज्यातील दहा जागांमध्ये नाशिकच्या दोन्ही जागेवरील एकाही उमेदवाराचे नाव नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : पहिल्या यादीत नाशिक जिल्हा वगळले

नाशिक : कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या जागा वाटपात नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला सोडण्यात आल्याने या दोन्ही जागांवर संभाव्य उमेदवारांची नावे मतदारात चर्चिली जाऊन त्यादृष्टीने त्यांनी प्रचाराला सुरुवातही केलेली असताना पक्षाने गुरुवारी जाहीर केलेल्या राज्यातील दहा जागांमध्ये नाशिकच्या दोन्ही जागेवरील एकाही उमेदवाराचे नाव नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. पक्षाची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल, असे सांगितले जात असले तरी, तीकधी होईल व उमेदवार कोणअसेल याबाबतची साशंकता कायम आहे.लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पहिला टप्पा सोमवार, दि. १८ मार्चपासून सुरू होत असून, त्यामुळे बुधवारी कॉँग्रेसने पाच उमेदवारांची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभेच्या दहा जागांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांची नावे जाहीर केली, तर हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडून लक्षद्विपच्या एका जागेवरील उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली. या यादीमध्ये नाशिक व दिंडोरीच्या जागेचाही समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना ती मात्र फोल ठरली.ज्या इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली त्यांनी पवार यांच्या दौऱ्यानंतर आपल्या राजकीय गाठीभेठींवर भर कायम ठेवला असून, गावोगावचे दौरे केले जात आहेत. नाशिकमधून भुजबळ कुटुंबीयांपैकी कोण? असा प्रश्न असून, दिंडोरीतून डॉ. भारती पवार की धनराज महाले यांचा फैसला पक्षाच्या नेत्यांना घ्यायचा आहे. उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू असले तरी, गुरुवारच्या यादीत नावे जाहीर होण्याची शक्यता फोल ठरली आहे. आता पक्षाच्या दुसºया यादीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.पवार यांच्या दौºयानंतरही प्रतीक्षाचविशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवस नाशकात तळ ठोकून संभाव्य उमेदवारांची चाचपणी व त्याचबरोबर मतदारांचाही कल जाणून घेतला. त्यामुळे पवार यांनी राजकीय अंदाज बांधून उमेदवार निश्चित केले असावेत असेच मानले जात असताना पहिल्या यादीत कुणाचाही नंबर लागला नाही.

 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस