शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीची वर्षपूर्ती : राष्टÑवादीतर्फे विधिवत वर्षश्राद्ध कॉँग्रेसतर्फे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:03 IST

भाजपा सरकारने देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नोटाबंदी केल्याने नागरिकांचीच कोंडी केली. तर काळा पैसाही जेथे आहे तेथेच राहिला व देश भ्रष्टाचार मुक्तही झाला नाही. नोटाबंदी करून आज एक वर्ष पूर्ण झाले. कॉँग्रेसतर्फे हजार व पाचशेच्या नोटांच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देभारतीय अर्थव्यवस्था कोलमडलीनागरिकांचीच कोंडी नोटाबंदी करून वर्ष पूर्ण निवेदन देऊन शासनाचा निषेध

त्र्यंबकेश्वर : भाजपा सरकारने देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नोटाबंदी केल्याने नागरिकांचीच कोंडी केली. तर काळा पैसाही जेथे आहे तेथेच राहिला व देश भ्रष्टाचार मुक्तही झाला नाही. नोटाबंदी करून आज एक वर्ष पूर्ण झाले. कॉँग्रेसतर्फे हजार व पाचशेच्या नोटांच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच काँग्रेसने या एक दिवसाला काळा दिन पाळला. या दिवसाचे स्मरण म्हणून आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, काँग्रेसचे कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे आदींनी एक निवेदन देऊन शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या.मागील वर्षी भाजपा सरकारने तडकाफडकी बंद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या, त्यामुळे देशभर असंतोष माजला होता. भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य जनता आजही भोगत आहे. आज नोटाबंदीची वर्षपूर्ती आहे. त्यासाठीच काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी या दिवसाचे काळा दिन म्हणूनच वर्षश्राद्ध घातले.यावेळी आमदार निर्मला गावित यांनी नोटाबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह सर्वच समाजघटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याची टीका केली. यावेळी शहराध्यक्ष वामन बदादे, दिनेश पाटील, निवृत्ती महाले, यशवंत महाले, निबयुन शेख, रोहिदास बोडके, बाळू बोडके आदी उपस्थित होते. राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे पाचशे व हजार रुपयांच्या नोटांचे विधिवत पिंडदान पुरोहितांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज काण्णव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कैलास मोरे, भास्कर मेढे, बाळू बोडके, उल्हास तुंगार, वसंतराव भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रा.काँ.तर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन या निर्णयाचा निषेध नोंदविला.