शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

अन्नपूर्णा प्रकल्प राज्यभर राबविण्यात यावा

By admin | Updated: September 5, 2015 00:20 IST

सी. विद्यासागर राव : मुंढेगाव येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचे उद्घाटन

नाशिक : आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण भोजन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, त्यासाठी शासनाकडे मुबलक प्रमाणात निधीही उपलब्ध आहे. नाशिकचा अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्यात यावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.आदिवासी विकास विभाग व टाटा ट्रस्ट तसेच अक्षयपात्र फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील अन्नपूर्णा या मध्यवर्ती स्वंयपाकगृहाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.४) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा होते. तसेच यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन,खा. हरिश्चंद्र चव्हाण,जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदारनिर्मला गावित,आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा,विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले,आदिवासी विकास आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर, टाटा ट्रस्टचे व्यंकटरामन, अक्षयपात्र संस्थेचे आर.मदन, माजी आमदार शिवराम झोले आदि मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात राजगोपाल देवरा यांनी सांगितले की, राज्यात टाटा ट्रस्टच्या गुंतवणुकीतून आणि आदिवासी विकास आयुक्तालयाच्या माध्यमातून मुंढेगाव व कांबळवाडी (पालघर) या दोन ठिकाणी ही मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची संकल्पना राबविण्यात येत आहे. व्यंकटरामन यांनी सांगितले की, देशातील आठ राज्यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून (पान ९ वर)असे उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून राबविण्यात येत आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, सर्वाधिक निधी आदिवासी विकास विभागामार्फत खर्च होतो; मात्र आजही आदिवासी भागातील वसतिगृह व आश्रमशाळांची अवस्था दयनीय आहे. त्यात अशा प्रकारच्या सुविधांमुळे आदिवासी भागातील कुपोषण कमी होण्यास मदत होईल. इथले जेवण इतके दर्जेदार आहे की, मुंबईहून येता जाता मी येथे जेवण करीत राहील,असे मिश्कीलपणे ते म्हणाले. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अशा प्रकारचे प्रकल्प गडचिरोली अमरावतीसह संपूर्ण राज्यात राबविणे गरजेचे आहे. निधीचा अजिबात तुटवडा नाही. निधी पडून आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये तिरंदाजी हा क्रीडा प्रकार लोकप्रिय असून त्यासाठीही सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन क्रीडा विषयक सुविधा पुरविल्यास येत्या आॅलिम्पिकमध्ये भारताला नक्की सुवर्णपदक मिळेल. यावेळी अपर आयुक्त अशोक लोखंडे, बाजीराव जाधव,जि.प.सदस्य गोरख बोडके,अ‍ॅड.संदीप गुळवे,अलका जाधव,नितीन वानखेडे,काशिनाथ मेंगाळ,कैलास चौधरी, भाऊसाहेब धोंगडे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)