शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त मॉस्कोत भरणार साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:13 IST

सामान्य माणसाची उर्मी जागी व्हावी व त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान द्यावे यासाठी जीवन कार्य व्यतित करणाºया लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियातील मॉस्को येथे दि. १ व २ आॅगस्ट २०२० रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृ तिक संमेलन सातारा येथील क्रांती थिएटर्ससह विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

नाशिक : सामान्य माणसाची उर्मी जागी व्हावी व त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान द्यावे यासाठी जीवन कार्य व्यतित करणाºया लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियातील मॉस्को येथे दि. १ व २ आॅगस्ट २०२० रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृ तिक संमेलन सातारा येथील क्रांती थिएटर्ससह विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. नाशिक विभागीय कार्यकारिणीची निवडही करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष अमर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.  अण्णा भाऊ साठे यांनी शोषणविरोधी व समाजवादी विचारांचा स्वीकार करून लोककलेद्वारे मानवी जीवनामध्ये सांस्कृतिक जीवन फुलविताना समाज मनाचा समन्वय बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साहित्याला व विचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठीच आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. या संमेलनासाठी उपस्थित राहू इच्छिणाºया समाजबांधवांनी स्वखर्चाने संमेलनाला उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले असून, संमेलनासाठी जवळपास तीन हजार साहित्य रसिक उपस्थित राहण्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृतिक संमेलनासाठी नाशिक विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, कार्यकारिणी अध्यक्षपदी उत्तम अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष भगवान अवघडे, कोषाध्यक्ष श्रीनिवास डोंगरे, सचिव शशीकांत गाडे, उत्तम, अहिरे, बाळासाहेब शिरसाठ, संपादक मंडळाचे प्रमुख कवी सुभाष पवार, विश्वास कांबळे, सुभाष पवार, डॉ. पितांबर जाधव, दिनकर लांडगे, रामराव पारधे, शांताराम पगारे, शाहीर विजय थोरात, गणेश जाधव, दिलीप साठे, अशोक साठे उपस्थित होते.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना सामाजिक कार्य व साहित्यासाठी भारतरत्न पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी संमेलनाच्या आयोजकांनी केली आहे. तसेच अण्णा भाऊंच्या सांगलीतील वाटेगाव येथील जन्मगावी राष्ट्रीय लोककला आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, विद्यापीठांमध्ये साठे अध्यासन केंद्र सुरू करावे, अशा विविध मागण्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.