शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त मॉस्कोत भरणार साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:13 IST

सामान्य माणसाची उर्मी जागी व्हावी व त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान द्यावे यासाठी जीवन कार्य व्यतित करणाºया लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियातील मॉस्को येथे दि. १ व २ आॅगस्ट २०२० रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृ तिक संमेलन सातारा येथील क्रांती थिएटर्ससह विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

नाशिक : सामान्य माणसाची उर्मी जागी व्हावी व त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान द्यावे यासाठी जीवन कार्य व्यतित करणाºया लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियातील मॉस्को येथे दि. १ व २ आॅगस्ट २०२० रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृ तिक संमेलन सातारा येथील क्रांती थिएटर्ससह विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. नाशिक विभागीय कार्यकारिणीची निवडही करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष अमर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.  अण्णा भाऊ साठे यांनी शोषणविरोधी व समाजवादी विचारांचा स्वीकार करून लोककलेद्वारे मानवी जीवनामध्ये सांस्कृतिक जीवन फुलविताना समाज मनाचा समन्वय बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साहित्याला व विचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठीच आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. या संमेलनासाठी उपस्थित राहू इच्छिणाºया समाजबांधवांनी स्वखर्चाने संमेलनाला उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले असून, संमेलनासाठी जवळपास तीन हजार साहित्य रसिक उपस्थित राहण्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृतिक संमेलनासाठी नाशिक विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, कार्यकारिणी अध्यक्षपदी उत्तम अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष भगवान अवघडे, कोषाध्यक्ष श्रीनिवास डोंगरे, सचिव शशीकांत गाडे, उत्तम, अहिरे, बाळासाहेब शिरसाठ, संपादक मंडळाचे प्रमुख कवी सुभाष पवार, विश्वास कांबळे, सुभाष पवार, डॉ. पितांबर जाधव, दिनकर लांडगे, रामराव पारधे, शांताराम पगारे, शाहीर विजय थोरात, गणेश जाधव, दिलीप साठे, अशोक साठे उपस्थित होते.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना सामाजिक कार्य व साहित्यासाठी भारतरत्न पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी संमेलनाच्या आयोजकांनी केली आहे. तसेच अण्णा भाऊंच्या सांगलीतील वाटेगाव येथील जन्मगावी राष्ट्रीय लोककला आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, विद्यापीठांमध्ये साठे अध्यासन केंद्र सुरू करावे, अशा विविध मागण्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.