शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभागामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:08 IST

भास्कर सोनवणे घोटी : इगतपुरी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कोठेही चारा टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तालुक्याच्या कानाकोपºयात तीव्र चारा टंचाई असतानाही ८२ हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा अजून ४ महिने पुरेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात परीस्थिती वेगळी असल्याने शेतकऱ्यांनी या कारभारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : चारा टंचाई असतांना ४ महिने पुरेल असा अहवाल दिला

भास्कर सोनवणेघोटी : इगतपुरी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कोठेही चारा टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तालुक्याच्या कानाकोपºयात तीव्र चारा टंचाई असतानाही ८२ हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा अजून ४ महिने पुरेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात परीस्थिती वेगळी असल्याने शेतकऱ्यांनी या कारभारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गवत आणि चाºयासाठी नागरिक इतर तालुक्यात वणवण फिरत असतांना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीमुळे लोकांच्या संतापात भर पाडली आहे.इगतपुरी तालुक्यात ह्या वर्षी जनावरांसह माणसांनाही तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणी आणि चाºयाअभावी जनावरांचे मृत्यू होत आहेत. घोटीच्या बाजार समितीत मातीमोल किमतीत जनावरे विकायला येत आहेत. अशा भयानक स्थितीत पशुधन धोक्यात असूनही पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाची असंवेदनशीलता समोर आली आहे.तालुक्यात मोठी जनावरे ६२ हजार ९०८ तर लहान जनावरे ४ हजार ६९९ आहेत. ह्या सर्व जनावरांसाठी सद्यस्थितीत ८२ हजार टन चारा तालुक्यात शिल्लक आहे. येत्या सप्टेंबर महिनाअखेर पर्यंत हा चारा पुरेल अशी माहिती इगतपुरीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रदीप कागणे यांनी दिली.इगतपुरी तालुक्यातील जनावरांना एका दिवसाला किमान ३ लाख ८६ हजार लिटर पाणी लागते. जनतेलाच पाणी नसल्याने चारा आणि पाण्यामुळे हतबल झालेल्या शेतकºयांनी घोटीच्या बाजार समितीत जनावरांची मातीमोल भावात विक्र ी सुरू केल्याचेही समोर आले आहे. दुधाच्या एकंदर उत्पन्नापैकी ४० टक्के दूध उत्पादन घटले आहे. तीव्र उन्हाळा, पाणी, चारा आदींमुळे जनावरे रोगग्रस्त होत असूनही तालुक्यातील १४ पशुवैद्यकीय केंद्रांतील पशु वैद्यकीय अधिकारी दुसरीकडे उपचारासाठी गेल्याच्या नावाखाली गायब राहत असल्याची लोकांची तक्र ार आहे.इगतपुरी तालुक्यात ८२ हजार टन चारा अजून ४ महिने पुरेल. इतर तालुक्याला सुद्धा इगतपुरीतुन चारा पाठवता येईल. ह्या तालुक्यात चाराटंचाई अजिबात नाही. टंचाई वाटत असेल तर महसूल विभाग योग्य कार्यवाही करील.- डॉ. प्रदीप कागणे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, इगतपुरीतीव्र स्वरूपाची दाहक पाणी टंचाई आणि चाºयाची भयानक टंचाई असतानाही पशुसंवर्धन विभाग लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. १५ दिवस चारा पुरेल अशी स्थिती नसतांना ४ महिने पुरेल असे सांगतांना काही वाटत नाही. कार्यालयात बसून आकडेवारी काढून इगतपुरी तालुक्याला मूर्ख बनवले जात असेल तर तीव्र आंदोलन करावे लागेल.- लकी जाधव, प्रदेश नेत,े आदिवासी विकास परिषद.चारा पाण्यामुळे जनावरे अखेरचा श्वास घेतांना दिसतात. अत्यल्प किमतीत जनावरे विकायला काढली जात आहेत. शेतकºयाला पाणी नसल्याने तो आधीच त्रस्त आहे. जनावरांना चारा-पाणी कोठून आणावे, याची भ्रांत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.- दादा घाडगे, शेतकरी, पिंपळगाव घाडगा.