शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

पशुसंवर्धन विभागामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:08 IST

भास्कर सोनवणे घोटी : इगतपुरी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कोठेही चारा टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तालुक्याच्या कानाकोपºयात तीव्र चारा टंचाई असतानाही ८२ हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा अजून ४ महिने पुरेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात परीस्थिती वेगळी असल्याने शेतकऱ्यांनी या कारभारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : चारा टंचाई असतांना ४ महिने पुरेल असा अहवाल दिला

भास्कर सोनवणेघोटी : इगतपुरी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कोठेही चारा टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तालुक्याच्या कानाकोपºयात तीव्र चारा टंचाई असतानाही ८२ हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा अजून ४ महिने पुरेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात परीस्थिती वेगळी असल्याने शेतकऱ्यांनी या कारभारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गवत आणि चाºयासाठी नागरिक इतर तालुक्यात वणवण फिरत असतांना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीमुळे लोकांच्या संतापात भर पाडली आहे.इगतपुरी तालुक्यात ह्या वर्षी जनावरांसह माणसांनाही तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणी आणि चाºयाअभावी जनावरांचे मृत्यू होत आहेत. घोटीच्या बाजार समितीत मातीमोल किमतीत जनावरे विकायला येत आहेत. अशा भयानक स्थितीत पशुधन धोक्यात असूनही पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाची असंवेदनशीलता समोर आली आहे.तालुक्यात मोठी जनावरे ६२ हजार ९०८ तर लहान जनावरे ४ हजार ६९९ आहेत. ह्या सर्व जनावरांसाठी सद्यस्थितीत ८२ हजार टन चारा तालुक्यात शिल्लक आहे. येत्या सप्टेंबर महिनाअखेर पर्यंत हा चारा पुरेल अशी माहिती इगतपुरीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रदीप कागणे यांनी दिली.इगतपुरी तालुक्यातील जनावरांना एका दिवसाला किमान ३ लाख ८६ हजार लिटर पाणी लागते. जनतेलाच पाणी नसल्याने चारा आणि पाण्यामुळे हतबल झालेल्या शेतकºयांनी घोटीच्या बाजार समितीत जनावरांची मातीमोल भावात विक्र ी सुरू केल्याचेही समोर आले आहे. दुधाच्या एकंदर उत्पन्नापैकी ४० टक्के दूध उत्पादन घटले आहे. तीव्र उन्हाळा, पाणी, चारा आदींमुळे जनावरे रोगग्रस्त होत असूनही तालुक्यातील १४ पशुवैद्यकीय केंद्रांतील पशु वैद्यकीय अधिकारी दुसरीकडे उपचारासाठी गेल्याच्या नावाखाली गायब राहत असल्याची लोकांची तक्र ार आहे.इगतपुरी तालुक्यात ८२ हजार टन चारा अजून ४ महिने पुरेल. इतर तालुक्याला सुद्धा इगतपुरीतुन चारा पाठवता येईल. ह्या तालुक्यात चाराटंचाई अजिबात नाही. टंचाई वाटत असेल तर महसूल विभाग योग्य कार्यवाही करील.- डॉ. प्रदीप कागणे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, इगतपुरीतीव्र स्वरूपाची दाहक पाणी टंचाई आणि चाºयाची भयानक टंचाई असतानाही पशुसंवर्धन विभाग लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. १५ दिवस चारा पुरेल अशी स्थिती नसतांना ४ महिने पुरेल असे सांगतांना काही वाटत नाही. कार्यालयात बसून आकडेवारी काढून इगतपुरी तालुक्याला मूर्ख बनवले जात असेल तर तीव्र आंदोलन करावे लागेल.- लकी जाधव, प्रदेश नेत,े आदिवासी विकास परिषद.चारा पाण्यामुळे जनावरे अखेरचा श्वास घेतांना दिसतात. अत्यल्प किमतीत जनावरे विकायला काढली जात आहेत. शेतकºयाला पाणी नसल्याने तो आधीच त्रस्त आहे. जनावरांना चारा-पाणी कोठून आणावे, याची भ्रांत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.- दादा घाडगे, शेतकरी, पिंपळगाव घाडगा.