शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाराज हरिश्चंद्र चव्हाण व्यासपीठावर आले, परंतु मोदींनी ना बघितले ना करू दिले भाषण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:01 IST

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले खरे, परंतु मोदींनी त्यांच्याकडे बघितलेही नाही की त्यांना भाषणही करू दिले गेले नाही.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले खरे, परंतु मोदींनी त्यांच्याकडे बघितलेही नाही की त्यांना भाषणही करू दिले गेले नाही.तीन वेळा खासदारकीची हॅट्ट्रिक करूनही भाजपाने यंदा दिंडोरी मतदारसंघात चव्हाण यांचे तिकीट कापले आणि आयारामांना संधी दिली. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यानंतर ते भाजपाच्या प्रचारात कुठेच नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर त्यांनीही आपला राग भाजपावर नसून व्यक्तीवर आहे, असे सांगितले होते. चव्हाण यांना पंतप्रधानांच्या सभेचे निमंत्रण नव्हते, मात्र नंतर ते देण्यात आले. त्यानुसार सोमवारी (दि.२२) ते सभेच्या ठिकाणी व्यासपीठावर आले होते. परंतु पक्षाचे व्यासपीठावरील काही नेत्यांनी त्यांच्याशी अंतर राखणेच पसंत केले. मोदी यांच्या आगमनाआधी अनेक आमदारांनी मनोगत व्यक्त केले. परंतु दिंडोरी मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांना बोलूही दिले गेले नाही. अहमदनगर येथे किमान खासदार दिलीप गांधी यांना बोलताना अडथळे आणण्यात आले होते, परंतु येथे तीही संधी दिली नाही.व्यासपीठावर मोदी आल्यानंतर त्यांनी नाशिकच्या खासदारांशी औपचारिक चर्चा केली, परंतु चव्हाण यांच्याशी मात्र ते बोलले नाहीत. त्यामुळे एकूणच या परिस्थितीत चव्हाण काय भूमिका घेतात याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीnashik-pcनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा