शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

नागरिकत्व कायद्यामुळे सरकारच्या विरोधात रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:55 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्रमाणे देशात केंद्र सरकारविरोधात एनआरसी, सीएए, एनपीआरच्या मुद्द्यांवरून जनतेत रोष आहे. अशा स्थितीत समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

ठळक मुद्देसत्यजित तांबे : युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत कार्यकर्त्यांना आवाहन

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्रमाणे देशात केंद्र सरकारविरोधात एनआरसी, सीएए, एनपीआरच्या मुद्द्यांवरून जनतेत रोष आहे. अशा स्थितीत समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.नाशिक शहरातील काँग्रेस भवन येथे शनिवारी (दि.१८) प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव तथा राज्याचे प्रभारी हरपालसिंह चुडासमा, नाशिकचे प्रभारी प्रशांत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सोतवे, राहुल पाटील, उद्धव पवार, बबलू खैरे, कल्याणी रांगोळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून उपस्थित युवक पदाधिकारी व कार्यकत्यांना सत्यजित तांबे यांनी ‘युवक जोडो’ अभियानाविषयी मार्गदर्शन करताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. नाशिक जिल्ह्यात काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक नागरिक असतानाही पक्षाची स्थिती खालावली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी युवक काँग्रेसने नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याच आवाहन करतानाच शहरातील महानगरपालिका निवडणुकांची आतापासूनच तयारी करण्याच्या दृष्टीने युवक नेत्यांची फळी उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या, तर हरपालसिंह चुडासमा यांनी कार्यकर्त्यांना देशातील केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याने सरकार विरोधात असंतोष आहे, असे सांगितले केले.सीएए, एनआरसी विरोधात कॅण्डल मार्चनाशिक जिल्हा व युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीएए, एनआरसी, सीएबी, जेएनयू हल्ला, नोटाबंदी व फसव्या आश्वासनांविरोधात काँग्रेस कमिटीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅण्डल मार्च काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या कॅण्डल मार्चमध्ये युवक काँग्रेससह शहर काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव हरपालसिंह चुडासमा. समवेत व्यासपीठावर प्रशांत ओगले, शरद अहेर, स्वप्नील पाटील, दिनेश सोतवे, राहुल पाटील आदी.सत्यजित तांबे : युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत कार्यकर्त्यांना आवाहननागरिकत्व कायद्यामुळे सरकारच्या विरोधात रोषनाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्रमाणे देशात केंद्र सरकारविरोधात एनआरसी, सीएए, एनपीआरच्या मुद्द्यांवरून जनतेत रोष आहे. अशा स्थितीत समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.नाशिक शहरातील काँग्रेस भवन येथे शनिवारी (दि.१८) प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव तथा राज्याचे प्रभारी हरपालसिंह चुडासमा, नाशिकचे प्रभारी प्रशांत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सोतवे, राहुल पाटील, उद्धव पवार, बबलू खैरे, कल्याणी रांगोळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून उपस्थित युवक पदाधिकारी व कार्यकत्यांना सत्यजित तांबे यांनी ‘युवक जोडो’ अभियानाविषयी मार्गदर्शन करताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. नाशिक जिल्ह्यात काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक नागरिक असतानाही पक्षाची स्थिती खालावली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी युवक काँग्रेसने नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याच आवाहन करतानाच शहरातील महानगरपालिका निवडणुकांची आतापासूनच तयारी करण्याच्या दृष्टीने युवक नेत्यांची फळी उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या, तर हरपालसिंह चुडासमा यांनी कार्यकर्त्यांना देशातील केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याने सरकार विरोधात असंतोष आहे, असे सांगितले केले.सीएए, एनआरसी विरोधात कॅण्डल मार्चनाशिक जिल्हा व युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीएए, एनआरसी, सीएबी, जेएनयू हल्ला, नोटाबंदी व फसव्या आश्वासनांविरोधात काँग्रेस कमिटीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅण्डल मार्च काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या कॅण्डल मार्चमध्ये युवक काँग्रेससह शहर काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Politicsराजकारण