शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नागरिकत्व कायद्यामुळे सरकारच्या विरोधात रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:55 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्रमाणे देशात केंद्र सरकारविरोधात एनआरसी, सीएए, एनपीआरच्या मुद्द्यांवरून जनतेत रोष आहे. अशा स्थितीत समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

ठळक मुद्देसत्यजित तांबे : युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत कार्यकर्त्यांना आवाहन

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्रमाणे देशात केंद्र सरकारविरोधात एनआरसी, सीएए, एनपीआरच्या मुद्द्यांवरून जनतेत रोष आहे. अशा स्थितीत समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.नाशिक शहरातील काँग्रेस भवन येथे शनिवारी (दि.१८) प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव तथा राज्याचे प्रभारी हरपालसिंह चुडासमा, नाशिकचे प्रभारी प्रशांत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सोतवे, राहुल पाटील, उद्धव पवार, बबलू खैरे, कल्याणी रांगोळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून उपस्थित युवक पदाधिकारी व कार्यकत्यांना सत्यजित तांबे यांनी ‘युवक जोडो’ अभियानाविषयी मार्गदर्शन करताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. नाशिक जिल्ह्यात काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक नागरिक असतानाही पक्षाची स्थिती खालावली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी युवक काँग्रेसने नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याच आवाहन करतानाच शहरातील महानगरपालिका निवडणुकांची आतापासूनच तयारी करण्याच्या दृष्टीने युवक नेत्यांची फळी उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या, तर हरपालसिंह चुडासमा यांनी कार्यकर्त्यांना देशातील केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याने सरकार विरोधात असंतोष आहे, असे सांगितले केले.सीएए, एनआरसी विरोधात कॅण्डल मार्चनाशिक जिल्हा व युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीएए, एनआरसी, सीएबी, जेएनयू हल्ला, नोटाबंदी व फसव्या आश्वासनांविरोधात काँग्रेस कमिटीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅण्डल मार्च काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या कॅण्डल मार्चमध्ये युवक काँग्रेससह शहर काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव हरपालसिंह चुडासमा. समवेत व्यासपीठावर प्रशांत ओगले, शरद अहेर, स्वप्नील पाटील, दिनेश सोतवे, राहुल पाटील आदी.सत्यजित तांबे : युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत कार्यकर्त्यांना आवाहननागरिकत्व कायद्यामुळे सरकारच्या विरोधात रोषनाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्रमाणे देशात केंद्र सरकारविरोधात एनआरसी, सीएए, एनपीआरच्या मुद्द्यांवरून जनतेत रोष आहे. अशा स्थितीत समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.नाशिक शहरातील काँग्रेस भवन येथे शनिवारी (दि.१८) प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव तथा राज्याचे प्रभारी हरपालसिंह चुडासमा, नाशिकचे प्रभारी प्रशांत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सोतवे, राहुल पाटील, उद्धव पवार, बबलू खैरे, कल्याणी रांगोळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून उपस्थित युवक पदाधिकारी व कार्यकत्यांना सत्यजित तांबे यांनी ‘युवक जोडो’ अभियानाविषयी मार्गदर्शन करताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. नाशिक जिल्ह्यात काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक नागरिक असतानाही पक्षाची स्थिती खालावली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी युवक काँग्रेसने नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याच आवाहन करतानाच शहरातील महानगरपालिका निवडणुकांची आतापासूनच तयारी करण्याच्या दृष्टीने युवक नेत्यांची फळी उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या, तर हरपालसिंह चुडासमा यांनी कार्यकर्त्यांना देशातील केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याने सरकार विरोधात असंतोष आहे, असे सांगितले केले.सीएए, एनआरसी विरोधात कॅण्डल मार्चनाशिक जिल्हा व युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीएए, एनआरसी, सीएबी, जेएनयू हल्ला, नोटाबंदी व फसव्या आश्वासनांविरोधात काँग्रेस कमिटीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅण्डल मार्च काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या कॅण्डल मार्चमध्ये युवक काँग्रेससह शहर काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Politicsराजकारण